विमानतळावरून बेस्टच्या २४ तास सेवा

Share

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईकरांसाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून मुंबईतील विविध ठिकाणी जाण्यासाठी सोमवारपासून २४ तास बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला ऑक्टोबर २०२१ पासून वातानुकूलित सेवा बेस्टने सुरू केली होती. ही बस सेवा आता २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई विमानतळापासून बॅकबे तसेच वाशी आणि ठाण्यासाठी टप्प्याटप्प्यात बससेवा सुरू केली आहे.

विशेष म्हणजे ही सेवा २४ तास उपलब्ध राहणार असून बॅकबेपर्यंतचे एका प्रवाशाचे प्रवास भाडे १७५ रुपये, ठाणे तसेच वाशीपर्यंतचे भाडे १५० रुपये असेल, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली.

विमानतळाहून येणारे प्रवासी किंवा कामावरून मध्यरात्री सुटणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. दरम्यान विमानतळ एक येथून रात्री ११ ते पहाटे ७ पर्यंत दर दोन तासांनी, तर बॅकबे येथून मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत दर दोन तासांनी बस सेवा उपलब्ध होणार आहे.

केवळ दक्षिण मुंबईच नाही तर वाशी भागातही बस सेवा मिळणार आहे. वाशीसाठीही रात्री सव्वा अकरा ते पहाटे सव्वा सात वाजेपर्यंत आणि वाशी येथून विमानतळासाठी मध्यरात्री सव्वा बारापासून ते पहाटे सव्वा आठ वाजेपर्यंत बससेवा असणार आहे. ठाण्यासाठी रात्री साडेअकरा वाजल्यापासून ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत आणि ठाणे ते विमानतळासाठी मध्यरात्री साडेबारा ते सकाळी ८.३० वाजेपर्यंत दर दोन तासांनी बससेवा असतील.

Recent Posts

Jio चा शानदार प्लान, एकदा रिचार्ज करा मिळवा ७३० जीबी डेटा

मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…

28 mins ago

उन्हाळ्यात मध खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

मुंबई: मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मधामध्ये व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. उन्हाळ्यात…

1 hour ago

IPL 2024: प्लेऑफचे सामने कुठे आणि कधी रंगणार? कोणत्या संघामध्ये होणार सामना घ्या जाणून

मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता…

2 hours ago

Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, अनेक दिग्गज मैदानात

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी…

4 hours ago

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

17 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

18 hours ago