बाबांचा आंबोली गावी मुक्काम

Share

समर्थ राऊळ महाराज

आबांची भ्रमंती सगळीकडे सुरूच होती. एका ठिकाणाहून पिंगुळीला आले की, लगेच दुसऱ्या गावची फेरी करत असत. एका ठिकाणी महाराज कधीच राहिले नाहीत. आंबोली गावी महाराजांनी मुक्काम केला. महाराज सावंतवाडीला गेले. त्यांच्या मनाची जशी लहर लागेल तसे ते आपला मोर्चा वळवित. सावंतवाडीला गेल्यानंतर ते अचानक दाणोलीला साटमच्या घरी जायचे. व तेथून आंबोली गावच्या प्रवासाला निघत. आंबोलीला गेले की तेथे मंगेशच्या बहिणीकडे ८/८ दिवस मुक्कामाला राहायचे. त्याचप्रमाणे आनंद वेंगुर्लेकर नावाच्या भक्ताकडे राहत. आनंदाच्या रिक्षेमधून बाबांनी खूप प्रवास केला आहे.

लहर लागली तर महाराज आंबोलीहूनच नरसोबाच्या वाडीला जायचे. तेथून परत पिंगुळीला गाडीने परतायचे आणि जर एखादे वेळेस ते क्रोधीत अवस्थेत असले, तर मग सर्वांना शिव्यांची लाखोली द्यायचे; परंतु बहुतकरून ते फिरतीवर असल्यानंतर महाराज कुठे असतील व कुठे जातील याचा थांगपत्ता कुणालाही लागत नसे. असे हे त्रिभुवन संचारी बाबा होते.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

6 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

7 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

8 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

8 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

8 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

9 hours ago