अमरावती (हिं.स.) मार्च, एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ८ जूनला ऑनलाईन जाहीर झाला. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि तपशीलवर गुण दर्शविणाऱ्या महाविद्यालयांच्या अभिलेखांचे वितरण विभागातील पाचही जिल्ह्यात १८ जूनपासून संबंधित शाळा-महाविद्यालयात होणार आहे.
विभागातील पाचही जिल्ह्यांतील बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाच्या गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शविणाऱ्या महाविद्यालयांच्या अभिलेखांचे वितरण करण्याबाबतचे नियोजन शिक्षण मंडळाने केले आहे.यानुसार १७ जूनला सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत जिल्ह्यातीलमहाविद्यालयांना गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शविणाऱ्या महाविद्यालयांच्या अभिलेखांचे वितरण मंडळाने नेमून दिलेल्या केंद्रावर केले जाणार आहे.
त्यानंतर सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत १८ जूनला दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरणकरताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…