आळंदी: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी (Sant Dnyaneshwar Palkhi ceremony) राज्यासह इतर राज्यातून लाखों भाविकांचा महामेळा आळंदीत जमला आहे. आज सायंकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार असतानाच पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटापट झाली. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आहे
पालखी सोहळ्यासाठी ४७ दिंड्यांना मंदिरात प्रवेश आहे. प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांना त्यात प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश दिला जातो. मात्र काही वारकरी मंदिर प्रवेश करण्यासाठी आग्रही होते. यामध्ये पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर हे वारकरी पोलीस बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांना आणि बॅरिकेट्सना लोटून देत मंदिर प्रवेशासाठी पुढे सरकले मात्र पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला आणि यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. यानंतर थोड्या वेळात प्रकरण शांत करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र हजारोच्या संख्येने असलेले वारकरी मात्र चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून मंदिर परिसरामध्ये पोलिसांनी अधिक बंदोबस्त वाढवला आहे.
खर्चानंतरही भासणार नाही पैशांची अडचण! मुंबई : आजच्या काळात प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या आपल्या भविष्याची चिंता असते.…
संजयने का केलं बॅकआऊट? मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'वेलकम टू जंगल' (Welcome to jungle)…
शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांचा संजय राऊत व उबाठा वर हल्लाबोल मुंबई : निवडणुकीच्या निकालानंतर…
केजरीवालांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी दिलं उत्तर पाटणा : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यात पूर्णपणे मतदान…
मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागला. अलिकडच्या काळात या आजाराची प्रकरणे कमी…
भ्रष्टाचार आणि खुनाचे आरोप यांमुळे उद्धव ठाकरे लंडनला पळणार नितेश राणे यांची जहरी टीका मुंबई…