Artificial Intelligence : एआयमुळे जगावर ‘वीजसंकट’!

Share

दर तासाला वापरली जातेय १७ हजार पट अधिक उर्जा

वॉशिंग्टन : आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयमुळे (Artificial Intelligence) एकीकडे लोकांची बरीच कामे सोपी झाली आहेत. मात्र, हळू-हळू एआयचे अनेक धोके देखील समोर येत आहेत. एकीकडे एआयमुळे नोकऱ्या जाण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच आता याच एआयमुळे जगावर मोठे वीज संकटही येऊ शकते, असा एका रिपोर्टमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

दि न्यूयॉर्करने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, ओपनएआय कंपनीचा चॅटजीपीटी हा चॅटबॉट एका तासाला तब्बल ५ लाख किलोवॅट वीज खर्च करतो. सध्या जगभरात कित्येक मोठ्या कंपन्यांनी आपले आपले एआय चॅटबॉट लाँच केले आहेत. एकट्या चॅटजीपीटीची आकडेवारी एवढी असेल, तर सगळ्यांची मिळून किती वीज खर्च होत असेल, हा विचारच हादरवून टाकणारा आहे.

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील घरांमध्ये मिळून जेवढी वीज वापरली जाते, त्या तुलनेत तब्बल १७,००० पट अधिक वीज चॅटजीपीटी दररोज वापरते.

चॅटजीपीटीच्या केवळ २० कोटी यूजर्ससाठी हा खर्च होतो. भविष्यात चॅटजीपीटीचा विस्तार झाला, त्याचे यूजर्स वाढले की पर्यायाने त्यासाठी होणारा विजेचा वापरही अधिक होणार आहे.

बिझनेस इन्सायडरला दिलेल्या मुलाखतीत डेटा सायंटिस्ट अ‍ॅलेक्स डी. व्रीज यांनी सांगितले, की गुगल सध्या प्रत्येक सर्च रिझल्टमध्ये जनरेटिव्ह एआय वापरत आहे. एआयमुळे वर्षाला सुमारे २९ बिलियन किलोवॅट प्रतितास एवढी वीज वापरली जाते. केनिया, क्रोएशिया अशा छोट्या देशांना संपूर्ण वर्षभरासाठी देखील ही वीज पुरून उरते, असे त्यांनी स्पष्ट केले.

एआयचा वापर जेवढ्या प्रमाणात वाढणार आहे, तेवढा त्यासाठी लागणाऱ्या विजेचा वापरही वाढणार आहे. एआयचे यूजर्स सध्या तुलनेने अगदीच कमी आहेत. मात्र, भविष्यात जेव्हा सगळ्या क्षेत्रांमध्ये एआय पसरेल आणि यूजर्स वाढतील तेव्हा त्यासाठी होणाऱ्या वीजेचा वापरही भरमसाठ वाढणार आहे. यामुळे आतापासूनच एआय कंपन्यांनी सोलर किंवा अन्य हरित उर्जेचा वापर करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

12 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

13 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

14 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

14 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

14 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

14 hours ago