मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी गुरूवारी भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारी जितेन गजारिया यांना ताब्यात घेतले आहे/
तसेच त्यांचा जवाब नोंदवण्यात आला आहे. दरम्यान यावेळी सायबर सेलच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जितेन गजारिया यांनी केलेले दोन्ही ट्विट हे कायद्याच्या चौकटीत आणि सभ्य भाषेतील आहेत. त्यामध्ये कोणत्याही आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला नाही. त्यामुळे आम्ही यापुढेही सभ्य भाषेत राजकीय ट्विट करत राहू.
रश्मी ठाकरे यांना ‘राबडीदेवी’ म्हटले, तर काय झाले? राबडीदेवी या बिहारच्या मुख्यमंत्री होत्या. मग रश्मी ठाकरे यांना राबडीदेवी म्हणण्यात काय चूक आहे?, असा सवाल जितेन गजारिया यांच्या वकिलांनी उपस्थित केला.
'या' भागातील चक्क १६ तास पाणीपुरवठा खंडित मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरीय क्षेत्रांमध्ये उकाडा…
पाहा तुमची रास आहे का यात? मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, दोन दिवसांनंतर अत्यंत शुभ राजयोगाची निर्मिती…
काही ट्रेन्स रद्द, तर काही उशिराने, पाहा वेळापत्रक मुंबई : रेल्वेचा मेगा ब्लॉक म्हटलं की…
मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…