मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक बड्या बड्या नेत्यांनी भाजपात (Bhartiya Janta Party) प्रवेश केला. इतकंच नव्हे तर कलाकार मंडळींनीही राजकारणात प्रवेश करताना भाजपची साथ दिली. त्यातच आता ‘अनुपमा’ मालिकेतून प्रचंड प्रसिद्धी मिळवलेल्या एका अभिनेत्रीने भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत आज हा प्रवेश पार पडला. रुपाली गांगुली (Rupali Ganguly) असं या अभिनेत्रीचं नाव असून त्यांच्यासोबत अमेय जोशी यांनीही भाजपा पक्षात प्रवेश केला.
रुपाली गांगुली या सध्या अनुपमा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत असून स्टार प्लसवरील त्यांची ही मालिका खूप चर्चेत आहे. या पक्षप्रवेशावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. त्या म्हणाल्या, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खूप मोठी चाहती आहे. आपल्या देशातील विकासाचं पर्व पाहिल्यावर मलाही वाटलं यात मी सहभागी झालं पाहिजे म्हणून मी हा पक्षप्रवेश केला. मोदींनी दिलेल्या मंत्रानुसार मी काम करणार आहे.”
भारतीय जनता पक्षाचे सचिव असलेले नेते विनोद तावडे यांनीही यावेळी काँग्रेस आणि इतर विरोधकांवर टीका केली. “विरोधी पक्ष आपल्या प्रचारात खोटं पसरवत आहे. ‘मत जिहाद’ करण्यापर्यंत काँग्रेस आता पोहोचली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या दोन्ही प्रवेशाने पक्षाला बळ मिळेल. दोघांचंही भाजपमध्ये स्वागत. ” असं ते यावेळी म्हणाले.
रुपाली या ही बंगाली कुटूंबातून आल्या असून त्यांचे वडील अनिल गांगुली हे दिग्दर्शक होते तर त्यांचा भाऊ विजय हा नृत्यदिग्दर्शक आहे. ‘साहेब’ या सिनेमातून रुपाली यांनी बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत दोन सिनेमांमध्ये काम केलं. तर सुकन्या या मालिकेतून त्यांनी टेलिव्हिजनविश्वात पदार्पण केलं. पण त्यांना ओळख मिळाली ती स्टार प्लसवरील ‘संजीवनी’ या मालिकेतून. या मालिकेत त्यांनी डॉ. सिमरन ही खलनायकी ढंगाची भूमिका साकारली होती. ही भूमिका खूप गाजली. तर त्यांची भाभी ही मालिकाही लोकप्रिय ठरली. अनुपमा ही मालिका तर सध्या धुमाकूळ घालत आहे. काही काळाने नेहमीच्या सास-बहू प्रकारातील मालिकांमधून बाहेर पडत त्यांनी ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेत काम केलं.
मुंबईत जे घडतं, त्याची चर्चा देशभर होते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक…
फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे काही लोकांना सतत खोटं बोलण्याची सवय असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकदा सातत्याने…
इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व…
मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सची अय्यर जोडीने कमाल केली. कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला हरवत दिमाखात आयपीएलच्या…
मुंबई: झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे रील बनवण्याच्या नादात तरुणाने १००…
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे नसल्याचे…