नागपूर : नागपूर (Nagpur) आणि अकोला (Akola) येथील विधान परिषद निवडणुकीतल्या (MLC Election) विजयानंतर हे मोठे कम बॅक असल्याचे आणि हा निकाल भाजपच्या आगामी काळातील विजयाची नांदी असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.
विधान परिषदेच्या ६ पैकी ४ जागेवर भाजपला विजय मिळाला असून, राज्यातील जनता भाजपसोबत असल्याचे फडणवीसांनी सांगितले. चंद्रशेखर बावनकुळेंचा विजय भविष्यातील विजयाची नांदी आहे. तसेच त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि नितीन गडकरी यांचेही आभार मानले. तसेच आपण स्वत: निवडून आल्यावर जेवढा आनंद झाला नव्हता, त्याहीपेक्षा अधिक आनंद आता झाल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले.
चंद्रशेखर बावनकुळे आणि वसंत खंडेलवाल यांचा या विजयाने महाविकासआघाडीला चपराख दिली असून, तीन पक्ष एकत्र आल्यावर काहीही होऊ शकतं.. हा गैरसमजही दुर केल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडीची मतं ही नागपुरमध्ये आम्हाला मिळाली असून, मत देणाऱ्यांचं आम्ही आभार मानतो, असंही ते म्हणाले.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या हंगामात आज एलिमिनेटरचा सामना रंगत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स…
मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते मात्र यशाचा मार्ग काही सोपा नाही. अशा…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध चतुर्दशी सायंकाळी ०६.४७ नंतर पौर्णिमा शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती…
मुंबईत जे घडतं, त्याची चर्चा देशभर होते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक…
फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे काही लोकांना सतत खोटं बोलण्याची सवय असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकदा सातत्याने…
इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व…