‘इन्व्हेस्ट राजस्थान’मध्ये १,९४,८०० कोटींची गुंतवणूक

Share

मुंबई (प्रतिनिधी): राजस्थान सरकारने महाराष्ट्रातील विविध विभागांत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय भागीदार सीआयआयबरोबर गुंतवणूकदार जोडणी अभियानाचे (इन्व्हेस्ट राजस्थान) आयोजन मुंबईत केले होते. राज्यस्तरीय गुंतवणूकदारांच्या बैठकीच्या साथीने राज्याने यशस्वीपणे १,२७,४५९ कोटी रुपये मूल्याचे सामंजस्य करार आणि ६७,३७९ कोटी रुपये मूल्याची उद्देशीय पत्रे (एलओआय) अशी मिळून एकूण १,९४,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. यावेळी राजस्थानच्या औद्योगिक आणि वाणिज्य मंत्री शकुंतला रावत यांची प्रमुख उपस्थिती होती.

जेएसडब्ल्यू फ्युचर एनर्जीने जैसलमेर जिल्ह्यात १०,००० मेगावॉटचा पुनर्वापर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी ४०,००० कोटी रुपये गुंतवणूकीचा प्रस्ताव ठेवला आहे. वेदांत समूहाने राज्यांत ३३,३५० कोटी रुपये मूल्याचा विस्तार प्रस्ताव सादर केला आहे. ग्रीनको एनर्जीजने एकात्मिक अक्षय ऊर्जा साठवणूक प्रकल्पासाठी ३०,००० कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडला आहे. अदानी ग्रीन एनर्जीने जैसलमेर, बारमेर, जालोर आणि जोधपूर येथील ४००० मेगावॉट च्या अक्षय ऊर्जा प्रकल्पासाठी २०,००० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे तर; अदानी टोटल गॅसने उदयपूर, भिलवारा, चितोडगड आणि बुंदी येथील सिटी गॅस पुरवठा प्रकल्पासाठी ३००० कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडला आहे. क्रिश फार्माने ७५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सिरोही मध्ये औषधनिर्माण उत्पादन केंद्राचा प्रस्ताव मांडला आहे. इतर ४० प्रस्तावित प्रकल्पांमध्ये यांचा समावेश आहे.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

5 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

5 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

6 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

6 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

7 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

7 hours ago