अमरावती (हिं.स.) : अमरावती तालुक्यातील माहूली जहागीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जामडोल शेतशिवारात आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक मेघ गर्जनेसह पाऊस पडला, यात शेतात काम करत असलेल्या ६ जणांच्या अंगावर वीज पडली, यात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर यात चार जण सुखरूप बचावले. मृतकांमध्ये किशोर भगवान पाटील आणि अविनाश श्यामराव निबोंरकर यांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार शेतात फवारणी करण्यासाठी गेले असता सदर प्रकार घडला, मृतक शेतकरी किशोर पाटील हे जामडोल येथे बऱ्याच वर्षा पासून शेती मक्ताने वाहीत होते, नेहमी प्रमाणे ते आपल्या शेतात मजूर घेऊन गेले होते, पाऊस आल्याने झाडाच्या आडोशाला सर्व सहाही जण थांबले असता त्यांच्या अंगावर वीज कोसळली यात ही घटना घडली, तर यात एक जण किरकोळ जखमी सुध्दा झाला, घटनास्थळी माहूली जहागीर पोलीस व महसूल कर्मचारी दाखल झाले होते.
कोकणी बाणा : सतीश पाटणकर मुंबई शहरात अनेक पर्यटन स्थळे, प्राचीन, प्रसिद्ध मंदिरांचा वारसा लाभला…
नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड प्रेमकहाणी या लेखामधून दोन प्रेमी जीवांची झालेली ताटातूट, तरी…
विशेष : लता गुठे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या यामुळे…
विशेष : भालचंद्र ठोंबरे महाभारतात कौरव पांडवांचे युद्ध होणार, हे निश्चित झाल्यावर, देशोदेशीच्या राजांनाही या…
नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे बाबुभाई मिस्त्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘पारसमणी’(१९६३) ही एक छोटी संगीत मेजवानी…