नवी दिल्ली : पश्चिम आशियाई देश पुन्हा एकदा युद्धाच्या झळांमध्ये होरपळून निघत आहेत. शनिवारी सकाळी हमासकडून इस्त्राईलवर(israel) हल्ला केल्यानंतर जगात पुन्हा एकदा नव्या युद्धाची सुरूवात झाली आहे. याचा परिणाम चारही बाजूंना पाहायला मिळत आहे. समोरचे संकट पाहता विमान कंपनी एअर इंडियाने इस्त्राईलची राजधानी तेल अवीवला जाणारी आपली उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द केली आहेत.
एअर इंडियाचे प्रवक्त्यांनी रविवारी दुपारी माहिती दिली की विमान कंपनी तेल अवीवला जाणारी तसेच तेथून येणारी सर्व उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवक्त्यांनी सांगितले की कंपनीने आपल्या चालक दलाचे सदस्य आणि सर्व प्रवाशांच्या सुरक्षेला लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्यांच्याकडे १४ ऑक्टोबरपर्यंतचे कन्फर्म तिकीट आहे त्या सर्व प्रवाशांना कंपनी शक्यतोपरी मदत करणार आहे.
टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडियाकडून तेल अवीव आणि नवी दिल्ली यांच्यात आठवड्यातून पाच वेळा विमानांची ये-जा केली जाते. ही उड्डाणे सोमवार, मंगळवार, गुरूवार, शनिवार आणि रविवारी होतात. कंपनीने शनिवारी पहिल्यांदा उड्डाण रद्द केल्याचे सांगितले.
हमासने इस्त्रायलवर शनिवारी सकाळीच हल्ला केला होता. यामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण पसरले. इस्त्रायलवर अशा पद्धतीचा हल्ला गेल्या पाच दशकांत पहिल्यांदा पाहायला मिळाला. हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने युद्धाची घोषणा केली.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या हंगामात आज एलिमिनेटरचा सामना रंगत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स…
मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते मात्र यशाचा मार्ग काही सोपा नाही. अशा…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध चतुर्दशी सायंकाळी ०६.४७ नंतर पौर्णिमा शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती…
मुंबईत जे घडतं, त्याची चर्चा देशभर होते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक…
फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे काही लोकांना सतत खोटं बोलण्याची सवय असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकदा सातत्याने…
इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व…