नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतावरही होऊ लागला आहे. एअर इंडियाने दिल्ली ते मॉस्को विमानसेवा रद्द केली आहे. एअर इंडियाची विमाने आठवड्यातून दोनदा दिल्लीहून मॉस्कोला जात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमा संरक्षण न मिळाल्याने एअर इंडियाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. याशिवाय, ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट काढलेलं आहे त्यांना पूर्ण परतावा दिला जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे रशियाकडे उड्डाण करणाऱ्या विमानांना जास्त धोका आहे, त्यामुळे विमानांना विमा संरक्षण मिळत नाही.
रशियन दूतावासाने सांगितले की, प्रिय नागरिकांनो, भारतीय विमान कंपनी एअर इंडियाने दिल्ली-मॉस्को-दिल्ली मार्गावरील तिकिटांची विक्री बंद केली आहे, याकडे आम्ही आपले लक्ष वेधतो. या विमान कंपनीची रशियाला उड्डाणे पुन्हा सुरू होण्याची शक्यता सध्या अनिश्चित आहे. एअर इंडियाच्या कार्यालयानुसार प्रवाशांना रद्द केलेल्या विमानांसाठीचा पूर्ण परतावा मिळण्याचा हक्क आहे.
तथापि, रशियन दूतावासाने सांगितले की ताश्कंद, इस्तंबूल, दुबई, अबू धाबी, दोहा आणि इतर मार्गांद्वारे दिल्ली ते मॉस्कोपर्यंत उड्डाण करणे अद्याप शक्य आहे.
सादर केलेला खर्च आणि शॅडो रजिस्टरची निवडणूक अधिकाऱ्यांनी केली तुलना पुणे : बारामती लोकसभा (Baramati…
तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्येही ६६ प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटली मुंबई : गेल्या काही दिवसांत…
प्रसाद ओकने नेमका कशावर व्यक्त केला संताप? मुंबई : हल्ली सोशल मीडियावर (Social media) इन्फ्लुएंसर्सची…
प्रवासी संघटनांनी व्यक्त केला संताप मुंबई : लोकल म्हणजे मुंबईकरांची (Mumbai Local) जीवनवाहिनी समजली जाते.…
मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश; तर तीन जण जखमी अकोला : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या…
उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी शब्द फिरवल्याचा केला आरोप नाशिक : लोकसभेच्या दृष्टीने नाशिकची जागा (Nashik Loksabha)…