वन हक्क दावे निकाली काढण्यासाठी आदिवासी समाजाचे ठिय्या आंदोलन

Share

भाईंदर : गेल्या अनेक वर्षांपासून सर्व्हेक्षण अहवालाच्या नावाखाली प्रलंबित असलेले आदिवासी समाजाचे वन हक्क दावे लवकर निकाली काढण्यासाठी मीरा रोडच्या आदिवासी समाजाने मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६च्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मीरा रोड येथील डोंगराळ भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या कक्षेत येतो. डोंगराच्या पायथ्याशी मांडवी पाडा, म्हसकर पाडा, माशाचा पाडा, दाचकूल पाडा, बाभळीचा भाट, असे छोटे-मोठे १५ आदिवासी पाडे आहेत. अनेक वर्षांपासून ते या भागात वास्तव्यास असुन जंगलातून लाकडे गोळा करणे आणि शेती हे त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे.

आदिवासी पाड्यातील घराच्या जवळच असलेल्या वन विभागाच्या जागेत या समाजाच्या कुटुंबांनी शेतीचा व्यवसाय सुरू केला. काहीजण भात, पालेभाज्या, फळे याची लागवड करून आपली उपजविका करत आहेत.

आता या जागा त्यांच्या नावावर करण्यासाठी त्यांनी शासन दरबारी प्रयत्न केले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांना या भागातील सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले होते. तलाठी विहित नमुन्यातील अर्ज भरणा करत असताना त्यांना महापालिकेतील काही नोंदी घेणे गरजेचे होते. त्यासाठी आदिवासी समाजाच्या विहित नमुन्यात काही त्रुटी असल्याने महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त यांना तहसीलदार कार्यालयात अहवाल सादर करण्यास विलंब झाला. असे ४५१ दावे प्रलंबित राहिले आहेत. ते लवकर निकाली काढण्यासाठी आदिवासी समाजाने श्रमजिवी संघटनेचे नेते सुलतान पटेल तसेच आदिवासी समाजाचे सामजिक कार्यकर्ते नरेंद्र उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रभाग कार्यालय क्र. ६ वर ठिय्या आंदोलन केले.

आदिवासी समाजाने भरायच्या विहित नमुन्यातील अर्जात असलेल्या त्रुटी त्यांनी पुर्ण केल्यावर तहसीलदार कार्यालयात अहवाल सादर करण्यात येईल. – प्रभाकर म्हात्रे, सहाय्यक आयुक्त, मीरा भाईंदर मनपा.

आदिवासी समाजाने त्यांच्या काही जागा बिल्डर, राजकीय नेते यांना विकल्या आहेत. त्या परत मिळविण्या साठी प्रयत्न करावेत. तसेच आदिवासी समाजाची आर्थिक फसवणूक करणाऱ्यावर शासनाकडून कारवाई करण्यात यावी. – प्रदिप जंगम, अध्यक्ष, जिद्दी मराठा प्रतिष्ठान.

Recent Posts

Crime : नात्याला कलंक! मुलाचा मळलेला ड्रेस पाहून जन्मदात्रीने केला ‘हा’ धक्कादायक प्रकार

बेदम मारहाण...कपड्यांशिवाय घराबाहेर उभं केलं आणि... नवी दिल्ली : आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला कलंक…

14 mins ago

JEE Advanced परिक्षेसाठी आज मिळणार प्रवेशपत्र!

जाणून घ्या प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया चेन्नई : JEE Advanced 2024 म्हणजेच, संयुक्त प्रवेश…

2 hours ago

Weather Update : उन्हाचा चटका कमी होणार! महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा कायम

'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली…

2 hours ago

HSC आणि SSC बोर्डाच्या परिक्षांच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट!

कधी जाहीर होणार निकाल? मुंबई : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाच्या दहावी आणि…

3 hours ago

Singapore News : कंपनी झाली मालामाल! बोनस म्हणून कर्मचाऱ्यांच्या हाती चक्क ८ महिन्यांचा पगार

जाणून घ्या नेमकं कसं उजळलं कर्मचाऱ्यांचं नशीब सिंगापूर : साधारणत: कंपन्यांकडून सणासुदीला किंवा नवीन वर्षाच्या…

3 hours ago

Amit Shah : पराभव झाल्यास भाजपाला ‘प्लॅन बी’ची गरज? काय म्हणाले अमित शाह?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या विजयासाठी जोरदार तयारी करत…

3 hours ago