मुरूड : अदानी पोर्टच्या आगरदांडा येथे होणाऱ्या रेल्वे भू-संपादन मोजणीला येथील स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत येथून जाणारा रेल्वे मार्ग हा गावाबाहेरील महामार्गालगत पासून नेण्यात यावा तसेच सातबारा वरील पेन्सिल शेरा रद्द करण्यात यावा, आदी मागण्यांसह विरोध दर्शवत आज मोजणी होऊ दिली नाही.
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख (मुरुड-जंजिरा) विभागाने येथील शेतकऱ्यांना आज दि. १० एप्रिल रोजी आगरदांडा येथे रेल्वे भू-संपादन मोजणीसाठी संयुक्त नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार सकाळी ९.३० वा. प्रत्यक्ष जागेवर हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे आज आगरदांडा येथे रेल्वे भू-संपादन मोजणीला संबंधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहून सदरचा रेल्वे मार्ग हा गावाबाहेरील महामार्गालगत पासून नेण्यात यावा तसेच सातबारा वरील पेन्सिल शेरा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत मोजणी होऊ दिली नाही.
यावेळी मुरुडच्या भूमी अभिलेखचे निमतानदार एम. पी. पोकळे, सहकारी तसेच रुषिकांत डोंगरीकर, यूसुफ अर्जबेगी, संतोष पाटील, आशिष नरेंद्र हेदूलकर, अर्पेश चिंदरकर, शब्बीर काझी, नजीर खतीब, तहसिन बशीर फकी, इमुद्दीन कादिरी, अहीर, मुब्बशिर खतीब आदिंसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या हंगामात आज एलिमिनेटरचा सामना रंगत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स…
मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते मात्र यशाचा मार्ग काही सोपा नाही. अशा…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध चतुर्दशी सायंकाळी ०६.४७ नंतर पौर्णिमा शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती…
मुंबईत जे घडतं, त्याची चर्चा देशभर होते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक…
फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे काही लोकांना सतत खोटं बोलण्याची सवय असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकदा सातत्याने…
इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व…