मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघ सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी तयारी करत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. पण नंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे वृत्त पुढे आले आहे. या दौऱ्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजबरोबर तीन वनडे आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
भारताचा वेस्ट इंडिजमधील दौरा २२ जुलैला सुरु होणार आहे, हा दौरा ७ ऑगस्टपर्यंत असणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये २२ जुलैला पहिला वनडे सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा वनडे सामना हा २४ जुलै आणि तिसरा वनडे सामना हा २७ जुलैला होणार आहे.
अन्य दोन्ही वनडे सामने हे पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हलवर होणार आहे. तिन्ही वनडे सामने हे संध्याकाळी ७.०० वाजता सुरु होणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका ही २९ जुलैपासून सुरु होणार आहे.
कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…
हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…
कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…
मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…
मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…
मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…