मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दंगली घडत असल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. औरंगजेबाचे स्टेटस लावल्याने महाराष्ट्रात काही ठिकाणी वाद झाले. यावर कारवाई होऊनही त्याचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत. हे वाद आता राजकीय वर्तुळात जाऊन पोहोचले आहेत. राज्यातील नेत्यांना आता धमकी देण्याचं सत्र सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एका ट्विटर हॅंडलवरुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. यात ‘तुझा लवकरच दाभोळकर होणार आहे’ अशा स्वरुपाची धमकी देत घाणेरड्या भाषेत शिवीगाळही करण्यात आली. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार व शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. तसेच महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, अत्यंत घाणेरडं आणि खालच्या पातळीवरचं राजकारण सुरु आहे, यात गृहविभागाने तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही वारंवार जीवे मारण्याची धमकी येत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. कालपासून ते छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. तेव्हापासून सातत्यानं त्यांना धमक्यांचे फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी फोन बंद करुन ठेवला असता त्यांचे बंधू व भांडुप मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांना त्याच व्यक्तीककडून धमकी आल्याचे संजय राऊत म्हणाले. यावेळी सरकारलाच आमचं बरंवाईट व्हावं असं वाटतं आणि त्यामुळे हे सर्व ते घडवत आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला.
दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, “धमकी देणं खपवून घेणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात एक उच्च परंपरा आहे. राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमकी देणं किंवा समाजमाध्यमांवर व्यक्त होताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणं खपवून घेतलं जाणार नाही. अशा प्रकरणात कायद्याप्रमाणे पोलीस निश्चित कारवाई करतील”‘ अशा कठोर शब्दांत फडणवीसांनी इशारा दिलेला आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…