मुंबई : व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांचे नाव वगळून अन्य १४ आमदारांची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. बहुमत चाचणीच्या वेळी या आमदारांनी व्हिपचे पालन केले नसल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
शिवसेनेच्या १५ आमदारांनी काल झालेल्या बहुमताच्या चाचणीच्या वेळी एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने मतदान केले नाही. या १५ आमदारांमध्ये आदित्य ठाकरे यांचाही समावेश आहे. पण, गोगावले यांनी केलेल्या तक्रारीमध्ये त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आल्याचे गोगावले यांनी सांगितले.
शिवसेनेच्या या १४ आमदारांना व्हीपचे पालन न केल्याने नोटीस देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील लढाई आता कायदेशीर मार्गावर पोहोचली आहे.
साप्ताहिक राशिभविष्य, १२ ते १८ मे २०२४ अनुकूल काळ मेष : शिक्षण, नोकरी-व्यवसायात अनुकूल काळ…
विभक्त कुटुंब पद्धती आणि बदलणारा काळ यामुळे वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली आहे. ज्येष्ठांनीही ती…
मुंबईतील धार्मिक स्थळांपैकी एक महालक्ष्मी मंदिर आहे. मुंबईतील महालक्ष्मीचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे, तो सारा…
माधवीताई म्हणतात की, “आजकालच्या तरुण पिढीचे आयुष्य अतिशय धावपळीचे झाले आहे. त्यांनी आयुष्यात थोडे विसाव्याचे…
नॉस्टॅल्जिया - श्रीनिवास बेलसरे यशवंत पेठकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘मोलकरीण’ हा १९६३ साली आलेला एक…