पुणे-मुंबई प्रवासात ई-बसची भर

Share

मुंबई (प्रतिनिधी): इव्हे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड लेक्ट्रिक बस ऑपरेटर कंपनीने (एमईआय समूह कंपनी) बुधवारपासून पुणे ते मुंबई दरम्यान “पुरीबस” नावाने आंतर-शहर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे.

विजयादशमीच्या (दसरा) शुभमुहुर्तापासून या इलेक्ट्रिक बसच्या नियमित प्रवासफेऱ्यांना सुरुवात झाली आहे. ही इलेक्ट्रिक बस पूर्ण चार्ज केल्यानंतर ३५० किमीपर्यंत अंतर सहज कापू शकते, असा कंपनीचा दावा आहे. प्रत्येक सीट जवळ चार्जर, आरामदायक पुश बॅक सीट, वाय-फायसह मनोरंजनासाठी बसमध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि सेफ्टीसाठीही अनेक लेटेस्ट फीचर्स या इलेक्ट्रिक बसमध्ये कंपनीने दिले आहेत.

इव्हे ट्रान्सद्वारे सुरु होणाऱ्या या आंतर-शहर सेवेमुळे, लांब पल्ल्याचा प्रवासही किफायतशीर, शून्य-उत्सर्जन, ध्वनीप्रदुषणाविना आणि आरामदायक प्रवास होईल असा कंपनीचा दावा आहे. शून्य-उत्सर्जन, इलेक्ट्रिक इंटरसिटी कोच बसमध्ये चालक आणि सहचालक सोडून ४५ प्रवासी बसू शकतात. मन प्रसन्न करणाऱ्या आकर्षक रंगसंगतीने बसची सजावट करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार केलेल्या या एसी ई-बसमध्ये आरामदायक पुश बॅक सीट आहेत. वाय-फायसह मनोरंजनासाठी बसमध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे.

इव्हे ट्रान्सच्या इलेक्ट्रिक बसमध्ये सुरक्षेचीही चांगली काळजी घेण्यात आली आहे. यात अनेक सुरक्षा प्रणाली आहेत, ज्यामध्ये टीव्हीयु प्रमाणित इयू मानांकित एफडीएसएस प्रणाली, भारतीय मानकानुसार बनवलेली एडीएएस प्रणाली (प्रगत चालक सहाय्य प्रणाली) आणि आयटीएस प्रणाली समाविष्ट आहे. बसमध्ये संकट समयी उपयोगात येणारे पॅनिक अलार्म सिस्टिम आणि इमर्जन्सी लाईट इत्यादींची व्यवस्थाही करण्यात आली आहे. याशिवाय बसमध्ये बसवलेले डी-फ्रॉस्टर धुक्यात वाहन चालवताना चालकाची व्हिजिबिलिटी सुधारण्यास मदत करतात.

Recent Posts

DC vs RR: सॅमसंगचा वादग्रस्त झेल, दिल्लीसमोर राजस्थान फेल…

DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेला सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे.…

38 mins ago

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शांततेत मतदान

महायुतीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह सिंधुदुर्ग : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात…

2 hours ago

देशात तिसऱ्या टप्प्यात ६१ टक्के तर महाराष्ट्रात ५४.०९ टक्के मतदान

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि…

2 hours ago

कडिपत्ता खाण्याने दूर होतात हे आजार

मुंबई: कडिपत्त्याचे सेवन खाण्यापासून ते अनेक औषधांमध्ये केला जातो. यातील अनेक औषधीय गुण अनेक आजारांमध्ये…

2 hours ago

काँग्रेसकडून कसाबचे समर्थंन हे देशासाठी धोकादायक

पंतप्रधान नरेंद्र मोदींने ओढले काँग्रेसच्या पाकिस्तानधार्जिण्या भूमिकेवर आसूड नगर : मुंबईवर झालेल्या २६/११ सागरी हल्ला…

3 hours ago

मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे बसले गप्प; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

मुंबई : पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? असा सवाल आता…

4 hours ago