मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात शनिवारी दिवसभरात सुमारे साडेआठ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना कोविड-१९ लस देण्यात आली, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी रविवारी दिली.
राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘मिशन कवच कुंडले अभियान’ राबविण्यात येत आहे. ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, शनिवारी दिवसभरात ६ हजार ४७ लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ८ लाख ६३ हजार ६३५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ८ कोटी ७२ लाख ९३ हजार ८४४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. शनिवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ९९ हजार ७१ लस देण्यात आली. त्यापाठोपाठ ठाणे (९०,१३९) आणि मुंबईमध्ये (८८,९९१) लस देण्यात आल्या.
शहरात लसीकरणाबाबत काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना अपर मुख्य सचिव व्यास यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील महानगरपालिका आयुक्तांकडून नियोजन केले जात आहे. शहरात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी डॉ. व्यास विशेष आढावा घेत आहेत.
CSK vs PBKS: चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जस हे दोन्ही संघ गुणतालिकेत पुढे जाण्यासाठी…
वर्षा गायकवाड यांची ११ कोटी ६५ लाख रूपयांची संपत्ती मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जनसेवा…
नवी दिल्ली : हिंदू विवाह हा एक संस्कार असून हा नाच-गाण्याचा, जेवणाचा किंवा दारु पिण्याचा…
दोडामार्ग सावंतवाडी कुडाळ आणि कणकवली सह वैभववाडी मध्ये ५०० पेक्षा जास्त कारखाने आणणार कणकवली :…
मनसे नेते अमेय खोपकरांची टीका मुंबई : मुंबईतील राजकारणात महत्त्वाचे केंद्र असणाऱ्या शिवाजी पार्कवरील सभेवरून…
नवी दिल्ली : कोविड लसींचे दुष्परिणाम शोधण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दिल्ली येथील…