देशात २५६८ नवे कोरोना रूग्ण

Share

नवी दिल्ली (हिं.स.) : देशात आज, मंगळवारी देशात अडीच हजारांहून अधिक कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. कालच्या तुलनेत १८.७ टक्के कमी रुग्ण संख्या आढळून आली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, गेल्या २४ तासांत २ हजार ५६८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोविडमुळे आणखी २० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दिल्ली (१०७६), हरियाणा (४३९), केरळ (२५०), उत्तर प्रदेश (१९३) आणि कर्नाटकमध्ये (१११) आले आहेत. नवीन कोविड प्रकरणांपैकी ८०.५८ टक्के या पाच राज्यांमधून आले आहेत. फक्त दिल्लीचा वाटा ४१.९ टक्के आहे. गेल्या २४ तासात कोरोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात आतापर्यंत ५,२३,८८९ लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यासोबतच गेल्या चोवीस तासांत २९११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या भारतात कोरोना रिकव्हरी रेट ९८.७४ टक्के आहे. भारतातील सक्रिय रुग्णांमध्येही घट झाली आहे. आता हा आकडा १९ हजार १३७ झाला आहे.

लस ही कोरोनाविरुद्धच्या लढाईतील सर्वात मजबूत शस्त्र आहे. गेल्या २४ तासांत १६ लाख २३ हजार ७९५ लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत देशात १८९ कोटींहून अधिक कोरोना प्रितबंधात्मक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

2 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

3 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

4 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

4 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

4 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

5 hours ago