समय रैनाने महाराष्ट्र सायबरसोबतचे आपले संबंध जुने असल्याचे सांगत 1930 हा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह असल्याचे सांगितले. या हेल्पलाइनवरून आपल्याला अनेकदा फोन येत असल्याचेही त्याने मिश्कीलपणे सांगितले. महाराष्ट्र सायबरच्या कामाचे कौतुक करताना त्याने ते भारतात असो किंवा परदेशात, संशयितांपर्यंत पोहोचू शकतात, अशा आशयाची टिप्पणी केली.
नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत असून, वाल्मिकीनगर गंडक बॅरेज येथे ...
यानंतर समयने आपल्या खास विनोदी शैलीत पूर्वीच्या एका प्रसंगाचा संदर्भ दिला. सायबर सेलचे अधिकारी एका कॉमेडियनच्या घरी पोहोचल्याचा उल्लेख करत त्याने यावेळी मात्र त्याच व्यक्तीचा सन्मान होत असल्याचे सांगितले. समयच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमातील वातावरण हलके झाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू आवरले नाही.
या कार्यक्रमात सायबर फसवणुकीपासून नागरिकांनी कसे सावध राहावे, याबाबतही जनजागृती करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना फसवणूक झाल्यास तातडीने 1930 या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले. पोलीस, सीबीआय किंवा इतर सरकारी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना घाबरवून पैसे उकळण्याचे प्रकार वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कार्यक्रमात ‘Digital Arrest’ या विषयावरील लघुपट आणि ‘1930 Maharashtra Cyber Anthem’चे अनावरण करण्यात आले. कलाकारांच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.






