नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही चॅनेलवर जाहिराती प्रसारित करण्याची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त केली आहे. यासंदर्भात केवळ टेलिव्हिजन नेटवर्क नियम, 1994 मध्ये सुधारणा करणारी राजपत्र अधिसूचना 21 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आली असून, त्याचबरोबर नवा नियम प्रभावी झाला आहे.
नवी दिल्ली : चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सर्दी-खोकल्यावरील काही औषधांच्या वापराबाबत महत्त्वाचा ...
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, टीव्ही प्रसारण क्षेत्रात निष्पक्ष स्पर्धा आणि व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्यासाठी जाहिरातींच्या कालावधीवरील मर्यादा हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टीव्ही चॅनेलसाठी 12 मिनिटांची जाहिरात मर्यादा वर्ष 2006 मध्ये लागू करण्यात आली होती. त्यावेळी देशात केवळ 62 टीव्ही चॅनेल होते. आता त्यांची संख्या 900 पेक्षा अधिक झाली आहे. याशिवाय केबल टीव्हीच्या डिजिटायझेशननंतर डीटीएच, केबलसारख्या प्लॅटफॉर्मवर दर्शकांना मोठ्या संख्येने चॅनेल उपलब्ध आहेत.
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने देशभरातील युवा पिढीशी (जेन झी) संवाद अधिक घट्ट करण्यासाठी आणि त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना ...
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानुसार, टीव्ही उद्योगात आता पुरेशी स्पर्धा अस्तित्वात आहे. तसेच डिजिटल माध्यमांवर जाहिरातींच्या कालावधीवर अशी कोणतीही मर्यादा नसल्यामुळे पारंपरिक टीव्ही चॅनेलसाठी समान संधीचा मुद्दाही उपस्थित होता.सरकारचे मत आहे की, जाहिरातींच्या कालावधीवरील मर्यादा हटवल्यामुळे टीव्ही चॅनेलना जाहिरात बाजारात अधिक लवचिकता मिळेल आणि ईज ऑफ डुइंग बिझनेसला चालना मिळेल.आता टीव्ही चॅनेलवर जाहिरातींसाठी निर्धारित केलेली कमाल 12 मिनिटांची मर्यादा लागू राहणार नाही.






