Nashik Crime : हात-पाय बांधलेल्या अवस्थेत विहिरीत महिलेचा मृतदेह, संशयित ताब्यात

Nashik Crime : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील दोडी बु. येथे चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह नारळाच्या बागेतील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संगीता मधुकर जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, आता या घटनेला धक्कादायक वळण मिळाले आहे. महिलेचा खून करून हात-पाय बांधून मृतदेह विहिरीत फेकल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी अनिल शरद पगारे (१८), रा. दोडी बुद्रुक या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आणखी एक संशयित पसार असून, त्याचा शोध सुरू आहे. (Nashik Crime News)



नेमकं काय घडलं ?


७ ऑगस्ट पासून संगीता या बेपत्ता होत्या. नातेवाईकांनी संगीता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांचा मोबाईल बंद होता, सोबतच घरी कुलूप असल्याचे आढळल्यानंतर नातेवाईकांनी परिसरात त्यांचा शोध सुरू केला. संगीता यांचा शोध लागत नसल्याने अखेर नातेवाईकांनी ८ ऑगस्ट रोजी संगीता जाधव बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. ९ ऑगस्ट रोजी नातेवाईकांनी दोडी बु. परिसरात पुन्हा शोधमोहीम सुरू केली. शोध घेत असताना गावातीलच एका नारळाच्या बागेतील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून, संशयितांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी कुंभार समाजाच्या संघटनेने सोमवारी जिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन देखील केले. तसेच वावी पोलिस ठाण्यातही निवेदन दिले‌. (Nashik Crime News)



संशयित ताब्यात


जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि वावी पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. तपासादरम्यान निफाड तालुक्यातून अनिल पगारे याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या संशयिताचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी के. के. पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल मोरे, उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके आणि पोलिस हवालदार शहाजी शिंदे यांच्या पथकाकडून तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Jalgaon Crime : कंटाळा आला आहे, आता मी निघतो...; सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

Jalgaon Crime : राजस्थानमध्ये पाठविलेल्या मालाचे ७ लाख रुपये मिळत नसल्याने एका तरुण उद्योजकाने आपली जीवनयात्रा संपवली

NMIA : नवी मुंबई विमानतळामुळे महामुंबईतील कनेक्टिव्हिटी झाली मजबूत

नवी मुंबई विमानतळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे (NMIA) केवळ हवाई वाहतुकीच्या क्षेत्रातच नव्हे, तर

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी

Jalgaon Crime : नवरा-बायकोमधील भांडणाचा धक्कादायक शेवट ! आई अन् मुलाने थेट...

Jalgaon Crime News : नवरा बायको यांच्यामध्ये होणारे आणि नंतर टोकाले पोहोचलेले वाद क्षणाधार्त आयुष्याची कशी राखरांगोळी करू