मुंबई : भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर आला असून देशभरात त्याची तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नागरिकांना ‘हर घर तिरंगा 2026’ अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी सोशल मीडियावर व्हिडिओ संदेश शेअर करत त्यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन केले. (Har Ghar Tiranga )
पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्याचे आवाहन केले. तसेच विकसित भारताचे ध्येय पुढे नेण्यासाठी नागरिकांनी संकल्प घेण्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करत त्यांनी आपला संदेश पूर्ण केला. (Narendra Modi)
मुंबई : मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर (Mumbai Local Train) मंगळवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. चालत्या लोकलमधून पडल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. साईराज ...
View this post on Instagram
भारत सरकारकडून यंदा ‘हर घर तिरंगा 2026’ अभियान 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्टदरम्यान राबवले जात आहे. या मोहिमेचा उद्देश नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वाढवणे आणि राष्ट्रध्वजाबद्दल आदर निर्माण करणे हा आहे. या काळात नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा फडकवण्यास किंवा सन्मानपूर्वक प्रदर्शित करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. (Independence Day)
या अभियानात नागरिक डिजिटल पद्धतीनेही सहभागी होऊ शकतात. तिरंग्यासोबतचा फोटो ऑनलाइन शेअर करून मोहिमेत सहभाग नोंदवता येतो. तसेच तिरंग्यासोबतचा फोटो अपलोड केल्यानंतर डिजिटल प्रमाणपत्र मिळवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Tirnaga Campaign)
दरम्यान, मंगळवारी सकाळी संसद ग्रंथालय भवनात एनडीएच्या साप्ताहिक संसदीय पक्षाच्या बैठकीपूर्वी तिरंगा फडकवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह एनडीएच्या नेत्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. (15 August)






