Nashik : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून (Nandur Madhmeshwar Weir) सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाच्या नाशिक पाटबंधारे विभागाने (Nashik Irrigation Department) शुक्रवारी (३१ जुलै) सायंकाळी ६ वाजता याबाबत सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
मुंबई : अभिनेत्री संभावना सेठ आणि तिचा पती अविनाश द्विवेदी यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्यांनी त्यांच्या घरात काम करणाऱ्या बाईमुळे ...
नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून विसर्गात वाढ
नाशिक पाटबंधारे विभागाने (Nashik Irrigation Department) दिलेल्या माहितीनुसार, नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून (Nandur Madhmeshwar Weir) यापूर्वी 39,917 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, सायंकाळी ६ वाजता त्यामध्ये 9,465 क्युसेकने वाढ करून एकूण 49,382 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने गोदावरी नदीपात्रालगतच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात असलेले साहित्य, शेतीसाहित्य किंवा जनावरे तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत तसेच नदीपात्रात जाणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जलसंपदा विभागाने स्थानिक प्रशासनास आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Nashik : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत नाफेडमार्फत (NAFED) आणि ...
गिरणा, मोसम, आरम नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे गिरणा, मोसम आणि आरम नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे चणकापूर, पुनद, हरणबारी आणि केळझर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने संबंधित धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव पाटबंधारे विभागाने (Malegaon Irrigation Division) नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Nashik Rain Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ...
धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू
मालेगाव पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार,
गिरणा नदी पात्रात -
1. चनकापूर धरण विसर्ग - ८,८६४ क्युसेक.
2. पुनंद धरण विसर्ग - १५,०० क्युसेक.
3. ठेंगोडा बंधारा विसर्ग – १५,२०० क्युसेक
मोसम नदी पात्रात -
4. हरणबारी धरण विसर्ग - ११,००० क्युसेक.
आरम नदी पात्रात -
5. केळझर धरण विसर्ग - ३,५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
Jalgaon Rain Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यभरात पावसानं धुव्वाधार बॅटिंग केली असून यात अनेक जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढलं ...
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुढील ४ ते ५ तास जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधील विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी नदीपात्रात किंवा पुलांवरून वाहणाऱ्या पाण्यात प्रवेश करू नये, जनावरे व मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे मालेगाव पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.