Kirit Somaiya : ४० लाख बांग्लादेशींनी खोट्या कागदपत्रांआधारे भरले 'एसआयआर' फॉर्म; किरीट सोमय्यांचा दावा

मशिदींमधून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप



मुंबई : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेअंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत ४० लाखांहून अधिक बांगलादेशी नागरिकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे गणना पत्र (इन्यूमरेशन फॉर्म) भरल्याचा खळबळजनक दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मशिदींमधून मोठ्या प्रमाणावर हे बोगस फॉर्म भरून घेतले जात असून, महाराष्ट्राच्या मतदार यादीत एकाही बांगलादेशी नागरिकाचे नाव राहू देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.



वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, मशिदींच्या माध्यमातून बोगस अर्ज भरण्याची मोहीम राबवली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे स्थानिक रहिवासी नसलेल्या व मूळच्या बांगलादेशी असलेल्या सुमारे आठ हजार व्यक्तींनी गणना पत्रे भरली आहेत. या सर्व संशयास्पद आणि बोगस अर्जांवर भाजपच्या वतीने आक्षेप नोंदवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.



'एसआयआर' अंतर्गत अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या प्रक्रियेचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, केवळ आठ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. राज्यातील सुमारे ३० टक्के मतदारांनी अद्याप आपले गणना पत्र भरलेले नाही. त्यामुळे सर्व वैध व पात्र मतदारांनी विनाविलंब आपले फॉर्म भरून मतदार यादीतील आपले स्थान निश्चित करावे, असे आवाहनही सोमय्या यांनी या वेळी केले.

Comments
Add Comment

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज जारी

राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार आगामी तीन दिवस महाराष्ट्रातील

Manu Bhaker : ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर महाकालच्या चरणी

उज्जैन : ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग भगवान

Justice Yashwant Varma : न्या. यशवंत वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : न्यायिक उत्तरदायित्व आणि सुधारणांसाठी अभियान (सीजेएआर) यांनी अलाहाबाद हायकोर्टाचे माजी

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी,