Team India : टी दिलीप यांची अचानक एक्झिट; टीम इंडियात कोणाची झाली एन्ट्री?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) कोचिंग (Coaching) स्टाफमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. असिस्टंट (Assistant) कोच रेयान टेन डोएशेट (Ryan ten Doeschate) यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांत आणखी एक मोठा निर्णय समोर आला आहे. फिल्डिंग (Fielding) कोच टी दिलीप (T Dilip) यांचा करार (Contract) इंग्लंड दौऱ्यानंतर (England Tour) संपुष्टात आला असून, बीसीसीआयने (BCCI) तो पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी सुभदीप घोष (Subhadeep Ghosh) यांची भारतीय संघाच्या नव्या फिल्डिंग (Fielding) कोचपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


माध्यमांतील वृत्तानुसार, सुभदीप घोष ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यापासून (Sri Lanka Tour) टीम इंडियासोबत काम सुरू करणार आहेत. त्यांचा कार्यकाळ २०२७ च्या एकदिवसीय (ODI) विश्वचषकापर्यंत (World Cup) असणार आहे. श्रीलंका दौऱ्यात भारत दोन कसोटी (Test) सामन्यांची मालिका (Series) खेळणार आहे.



आसामचे (Assam) रहिवासी असलेले सुभदीप घोष यांनी आंतरराष्ट्रीय (International) क्रिकेट खेळले नसले तरी प्रशिक्षक (Coach) म्हणून त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. ते यापूर्वी भारतीय महिला (Women’s Team) संघ आणि भारतीय १९ वर्षांखालील (Under-19) संघाचे फिल्डिंग (Fielding) कोच राहिले आहेत. यावर्षी भारतीय अंडर-१९ (Under-19) संघाने विश्वचषक (World Cup) जिंकला, त्यावेळीही ते संघाच्या कोचिंग (Coaching) स्टाफचा महत्त्वाचा भाग होते.


सुभदीप घोष यांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) देखील काम केले आहे. २०१८ मध्ये ते दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) तर २०१९ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाच्या कोचिंग (Coaching) स्टाफमध्ये होते. त्यानंतर २०२० मध्ये त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (National Cricket Academy - NCA) प्रवेश केला. २०२१ मध्ये इंडिया ए (India A) संघाच्या ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावरही त्यांनी फिल्डिंग (Fielding) कोच म्हणून काम केले. मागील सहा वर्षांपासून ते भारतीय क्रिकेट व्यवस्थेत (Indian Cricket System) सातत्याने कार्यरत आहेत.


खेळाडू (Player) म्हणून सुभदीप घोष यांची कारकीर्द फार मोठी नव्हती. त्यांनी आसाम आणि रेल्वे (Railways) संघाकडून १७ प्रथम श्रेणी (First-Class) आणि १७ लिस्ट ए (List A) सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्यांनी अनुक्रमे ३१६ आणि ३०७ धावा (Runs) केल्या. २००५ मध्ये त्यांनी व्यावसायिक (Professional) क्रिकेटला निरोप दिला.


दुसरीकडे, टी दिलीप यांची राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या कार्यकाळात फिल्डिंग (Fielding) कोच म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, अलीकडील काळात भारतीय संघाच्या फिल्डिंग (Fielding) कामगिरीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. आयर्लंड (Ireland), इंग्लंड (England) आणि झिम्बाब्वे (Zimbabwe) दौऱ्यांदरम्यान भारतीय संघाने तब्बल २१ झेल (Catches) सोडल्याची नोंद आहे. त्यामुळे बीसीसीआयने (BCCI) त्यांचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. आता नव्या फिल्डिंग (Fielding) कोच म्हणून सुभदीप घोष यांच्यासमोर टीम इंडियाची (Team India) क्षेत्ररक्षण (Fielding) कामगिरी अधिक भक्कम करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

Comments
Add Comment

Commonwealth Games 2026 : भारताची पदकांची कमाई सुरूच! हरजिंदर कौर आणि गुलवीर सिंहची रौप्य झेप; पदकसंख्या पोहोचली १२ वर

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी कायम असून मंगळवारी भारतीय खेळाडूंनी आणखी दोन

Fast bowler Justin Greaves : जस्टिन ग्रीव्हसचा ऐतिहासिक पराक्रम, पण मराठमोळ्या बापू नाडकर्णींचा ६२ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम आजही अभेद्य!

मुंबई : वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जस्टिन ग्रीव्हस (Fast bowler Justin Greaves) याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी

World Chess Championship : गुकेश आणि सिंदारोव्ह यांच्यातील जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढत जिनिव्हामध्ये रंगणार

नवी दिल्ली : विद्यमान जागतिक विजेता गुकेश डी आणि आव्हानवीर जावोखिर सिंदारोव्ह यांच्यातील २०२६ ची जागतिक

ISSF World Cup : सोनम आणि हिमांशूला १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक

हाँगझोऊ : चीनमधील हाँगझोऊ येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषकात भारतीय रायफल नेमबाज सोनम उत्तम मस्कर आणि

Valluri Ajaya Babu : कोण आहे वल्लुरी अजय बाबू ? आधी वडिलांनी जिंकले पदक , १६ वर्षानंतर मुलाने बापाला टाकले मागे

ग्लासगो : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत आतापर्यंत १० पदके जिंकली आहेत. यात

IND VS SL : बीसीसीआयची मोठी घोषणा! श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; या खेळाडूचा पहिल्यांदाच भारतीय संघात समावेश

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात ऑगस्टमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय