Nashik : एल निनोच्या प्रभावामुळे पावसाने राज्यभरात पाठ फिरवली असल्याचं चित्र होतं. या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाईचा धोखा लक्षात घेता नाशिक महापालिकेने (Nashik Municipal Corporation) पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. नाशिक मध्ये दर शनिवारी पाणी कपातीचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता. तर ऑगस्टमध्ये दर दिवसाआड पाणी कपात करण्यात येणार होती. मात्र मात्र पावसाने जूनची कसर भरून काढत या महिन्यामध्ये जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसाने गोदावरी नदीला दोन मोठे पूर आले. सोबतच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून आजही पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरण साठा पूर्ण जवळपास 95% च्या पुढे गेलाय.
सातारा : गेल्या काही दिवसांपासून नीट पेपरफुटीमुळे देशभरात आंदोलने सुरु होती. नीट पेपरफुटीमुळे आणि परिक्षेतील अपयशाने खचल्याने अनेक विद्यार्थ्यांनी ...
महापौरांच्या हस्ते जलपूजन करण्याची परंपरा
दरम्यान, गंगापूर धरण भरल्यानंतर दरवर्षी महापौरांच्या हस्ते जलपूजन करण्याची परंपरा आहे. मात्र १३ मार्च २०२२ पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्याने गेली चार वर्षे ही परंपरा खंडित झाली होती. आता गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने आज नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्त महापौर हिमगौरी आहेर-आडके (Himgauri Adke Aher) यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. सकाळी आठ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला उपमहापौर विलास शिंदे (Deputy Mayor Vilas Shinde), स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप (Standing Committee Chairman Machindra Sanap), आयुक्त मनीषा खत्री (Municpal Commissioner Manisha Khatri), सर्व गटनेते, नगरसेवक तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
चार वर्षांचा खंड संपला !
शहराचे पहिले महापौर दिवंगत शांताराम बापू वावरे (Shantaram Bapu Vavre) यांच्या काळापासून ही जलपूजनाची परंपरा सुरू झाली . मात्र निवडणूक न झाल्याने महापालिकेत २०२२ पासून चार वर्ष प्रशासकीय राजवट होती. आता चार वर्षांच्या खंडानंतर महापौरांच्या हस्ते जलपूजन झाल्याने परंपरेला पुन्हा सुरुवात झाली असल्याची भावना नाशिककरांकडून व्यक्त केली जातेय.