मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच देशाच्या युवा पिढीचा विचार केला आहे आणि भविष्यातही त्यांच्या शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार आणि सक्षमीकरणासाठी ते तितक्याच बांधिलकीने कार्य करत राहतील, याचा आम्हाला विश्वास आहे. आज भारताकडे जगातील सर्वाधिक युवा शक्ती आहे, हीच आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. देशविरोधी शक्तींनाही ही ताकद माहिती आहे. त्यामुळेच खोटे आरोप, संभ्रम आणि फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून या युवा शक्तीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आम्ही हा अपप्रचार यशस्वी होऊ देणार नाही. ‘धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार आहोत,” असे प्रतिपादन कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेण्यात आलेल्या ऐतिहासिक निर्णयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘धन्यवाद मोदीजी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता स्व. तुकाराम ओंबळे चौक, चौपाटी, गिरगाव, मुंबई येथे होणार आहे.
ॲल्युमिनियम फॉइल वापरून आपल्या घरातील Wi-Fi चा स्पीड कसा वाढवतात? नेटवर्कच्या त्रासाला कंटाळून, बहुतेक लोक नवीन महागडा राउटर विकत घेण्याचा विचार करू ...
या कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020), मल्टिपल एन्ट्री आणि एक्झिट प्रणाली, PM SHRI शाळा, PM e-VIDYA, DIKSHA, प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना, प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना, IIT, IIM आणि AIIMSचा विस्तार, स्किल इंडिया अभियान, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY), PM-SETU, ऑपरेशन गंगा अशा विद्यार्थी आणि युवकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणाऱ्या विविध निर्णयांची माहिती फलकांच्या माध्यमातून नागरिकांसमोर मांडण्यात येणार आहे.
लोढा पुढे म्हणाले, “विरोधकांकडे विकासाची दृष्टी नसल्याने ते खोट्या प्रचाराचा आधार घेत आहेत. आंदोलने, अपप्रचार आणि फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून देशातील युवकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र सत्य जनतेसमोर मांडणे ही आमची जबाबदारी आहे. ‘धन्यवाद मोदीजी’ हा केवळ कार्यक्रम नसून देशाच्या युवा शक्तीने अनुभवलेल्या सकारात्मक परिवर्तनाबद्दल व्यक्त होणारी कृतज्ञतेची भावना आहे. मोदीजींनी विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी आणि त्यांच्या भविष्याच्या उभारणीसाठी घेतलेला प्रत्येक निर्णय आम्ही जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत.”
भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा, विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होणार असून, युवकांच्या भविष्याला दिशा देणाऱ्या निर्णयांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहेत.





