मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी घाटकोपर येथे नवीन केबल-स्टेड पूल उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. या प्रकल्पामुळे अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MRIDC) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. (Mumbai)
घाटकोपर रेल्वे पूल पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणारा महत्त्वाचा मार्ग होता. मात्र, 2018 मध्ये झालेल्या सुरक्षा तपासणीत हा पूल धोकादायक असल्याचे आढळल्यानंतर तो वाहनांसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर वाहनचालकांना जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) आणि अंधेरी-घाटकोपर लिंक रोड (AGLR) या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. (Ghatkopar Bridge)
ही समस्या लक्षात घेऊन गोळीबार रोड जंक्शनपासून पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत नवीन केबल-स्टेड पूल उभारला जाणार आहे. हा पूल थेट लाल बहादूर शास्त्री (LBS) मार्गाशी जोडला जाईल. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील संपर्क अधिक वेगवान होणार आहे. (Mumbai Infrastructure)
या पुलाच्या बांधकामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पूल मध्य रेल्वेच्या मार्गावरून, मेट्रो 4 च्या मार्गावरून तसेच बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित भुयारी मार्गाच्या वरून जाणार आहे. पुलाचा मुख्य भाग केबल-स्टेड पद्धतीने बांधला जाणार असून काही भाग स्टील स्पॅन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केला जाईल. पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पदपथाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
बांधकाम टप्प्याटप्प्याने केले जाणार असून एका बाजूचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या मार्गावर वाहतूक सुरू केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम हाती घेतले जाणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. ( Eastern Express Highway)
हा पूल सुरू झाल्यानंतर साकीनाका, मरोळ, मुंबई विमानतळ, घाटकोपर तसेच एलबीएस मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय AGLR, JVLR, पंतनगर, गांधीनगर आणि विक्रोळी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही या प्रकल्पाची मोठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. (Mumbai news)
Constitution Amendment : गेल्या 12 वर्षांत आठ घटना दुरुस्त्या, सरकारची संसदेत माहिती
नवी दिल्ली : गेल्या बारा वर्षांत भारताच्या राज्यघटनेत आठ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल ...
Kargil Vijay Diwas : राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर योद्ध्यांना श्रद्धांजली
नवी दिल्ली : कारगिल विजय दिनानिमित्त (Kargil Vijay Diwas) कृतज्ञ राष्ट्र आज वीर जवानांना अभिवादन करत आहे. यावर्षीचा मुख्य कार्यक्रम नवी दिल्लीऐवजी लडाखमधील द्रास ...






