Shubham Gill : कुलदीपला का डावलण्यात आलं? शुभमन गिलने दिली मोठी माहिती; निर्णय योगय होता की नाही ?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत, इंग्लंडने २-१ ने भारतावर विजय मिळवला. या तिन्ही सामन्यांमध्ये कुलदीपला संधी देण्यात आली नव्हती. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह दुखपतीमुळे संघातून बाहेर झाला होता. त्याच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, या त्याला एकही सामन्यात संधी देण्यात आली नाही. यामुळे प्रशिक्षक गंभीर आणि व्यावस्थापनेवर जोरदार टीका केली जात आहे. (Ind vs Eng)



कुलदीप यादवला इंग्लंड दौऱ्यात एकही सामन्यात संधी देण्यात आली नाही. त्याला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेपासूनही वगळण्यात आले होते. यावर भारतीय कर्णधार शुभमन गिलने कुलदिप संधी का देण्यात आली नाही यावर स्पष्टीकरण दिले आहे. (Shubham Gill)



कुलदीपला संधी का देण्यात आली नाही ?


लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या सामन्यानंतर प्रेझेंटेशनमध्ये शुभमन गिलने कुलदीप यादवला संधी का देण्यात आली नाही यावर स्पष्टीकरण दिले. गिल म्हणाला, "आम्ही आधीच्या सामन्यांमध्ये पाहिले होते की खेळपट्टया फिरकीपटूंना फारशी मदत करत नव्हत्या. जेव्हा जेव्हा फिरकीपटू गोलंदाजीसाठी येत, तेव्हा आम्हाला बचावात्मक क्षेत्ररक्षण लावावे लागत असे. याउलट, वेगवान गोलंदाज प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरत होते. म्हणूनच आम्ही अतिरिक्त फिरकीपटूला संधी दिली नाही." (Gautam Ghambhir)



तिसऱ्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांना इंग्लंडच्या फलंदाजांना रोखता आले नाही.इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांची धुलाई करत ५० षटकात ३८७ धावा केल्या. या संपूर्ण मालिकेत भारतीय गोलंदाजांना मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेता आले नाही. शुभमन गिलने मान्य केले की सामन्याच्या सुरुवातीला जी खेळपट्टी होती, सामना जसाजसा पुढे सरकला ती खेळपट्टी आणखी स्लो होत गेली. जेव्हा गोलंदाजीला अक्षेर पटेल गोलंदाजीला आला, तेव्हा खेळपट्टी इतकी स्लो होईल याचा आम्हाला अंदाजा नव्हता. मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) आणि वरुण आरोन (Varun Aaron) यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी आणि विश्लेषकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment

Commonweath Games 2026 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये मोठे बदल ! प्रमुख खेळांना वगळण्यात आले, भारतावर किती होणार परिणाम ?

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ ची सुरुवात २३ जुलैपासून होणार आहे. यंदाची स्पर्धा स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे आयोजित

P.V. Sindhu - Virat Kohli : पी. व्ही. सिंधूच्या कमबॅकमध्ये किंग कोहलीचा सिंहाचा वाटा; विराट कोहलीच्या 'त्या' एका सल्ल्याचा सिंधूवर असा झाला सकारात्मक परिणाम

- सिंधूची तब्बल दोन वर्षांनंतर मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी मुंबई : भारताची स्टार

Spain vs Argentina : अंतिम सामन्यांनंतर अर्जंटिनाला मोठा धक्का ! फिफाकडून खेळाडूंवर कारवाईची शक्यता; नेमकं प्रकरण काय ?

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनने १-० ने अर्जेंटिनाचा पराभव केला होता. अंतिम सामन्यांनंतर

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनचा विश्वचषक विजेता संघ मायदेशी परतला; माद्रिदमध्ये २० लाख लोकांकडून ऐतिहासिक आणि शाही स्वागत

माद्रिद: न्यू जर्सी येथे पार पडलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा १-० अशा गोलने पराभव करत विश्वचषक

Team India Zimbhave Tour : भारताचा युके दौरा संपला;आता झिम्बाब्वेविरुद्धचे पुढचे सामने कधी ?

मुंबई : इंग्लंड दौऱ्यात निराशाजनक कामगिरीनंतर भारतासमोर आता झिम्बाब्वेविरुद्ध पुनरागमन करण्याची संधी आहे.

PV Sindhu : चायना ओपनमध्ये पीव्ही सिंधूकडे भारताचे नेतृत्व; सात्विक आणि चिरागची दुखापतीमुळे माघार

नवी दिल्ली : जपान ओपन सुपर ७५० विजेतेपद जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेली भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही