लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत, इंग्लंडने २-१ ने भारतावर विजय मिळवला. या तिन्ही सामन्यांमध्ये कुलदीपला संधी देण्यात आली नव्हती. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह दुखपतीमुळे संघातून बाहेर झाला होता. त्याच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, या त्याला एकही सामन्यात संधी देण्यात आली नाही. यामुळे प्रशिक्षक गंभीर आणि व्यावस्थापनेवर जोरदार टीका केली जात आहे. (Ind vs Eng)
MUMBAI : वर्धा जिल्ह्यातील रोठा गावात घडलेली १२ वर्षीय मुलीवरील अत्यंत अमानुष क्रूरता आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. ...
कुलदीप यादवला इंग्लंड दौऱ्यात एकही सामन्यात संधी देण्यात आली नाही. त्याला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेपासूनही वगळण्यात आले होते. यावर भारतीय कर्णधार शुभमन गिलने कुलदिप संधी का देण्यात आली नाही यावर स्पष्टीकरण दिले आहे. (Shubham Gill)
भाजपकडून २२ जुलै ते ५ ऑगस्टदरम्यान 'सेवा यज्ञ'; महारक्तदान शिबिरांसह विविध उपक्रमांचे आयोजन मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) ...
कुलदीपला संधी का देण्यात आली नाही ?
लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या सामन्यानंतर प्रेझेंटेशनमध्ये शुभमन गिलने कुलदीप यादवला संधी का देण्यात आली नाही यावर स्पष्टीकरण दिले. गिल म्हणाला, "आम्ही आधीच्या सामन्यांमध्ये पाहिले होते की खेळपट्टया फिरकीपटूंना फारशी मदत करत नव्हत्या. जेव्हा जेव्हा फिरकीपटू गोलंदाजीसाठी येत, तेव्हा आम्हाला बचावात्मक क्षेत्ररक्षण लावावे लागत असे. याउलट, वेगवान गोलंदाज प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरत होते. म्हणूनच आम्ही अतिरिक्त फिरकीपटूला संधी दिली नाही." (Gautam Ghambhir)
हैदराबाद येथील प्रतिष्ठित 'नॅशनल पोलीस अकादमीमध्ये' (NPA) एका आयपीएस प्रशिक्षणार्थीने (IPS Trainee) विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर ...
तिसऱ्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांना इंग्लंडच्या फलंदाजांना रोखता आले नाही.इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांची धुलाई करत ५० षटकात ३८७ धावा केल्या. या संपूर्ण मालिकेत भारतीय गोलंदाजांना मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेता आले नाही. शुभमन गिलने मान्य केले की सामन्याच्या सुरुवातीला जी खेळपट्टी होती, सामना जसाजसा पुढे सरकला ती खेळपट्टी आणखी स्लो होत गेली. जेव्हा गोलंदाजीला अक्षेर पटेल गोलंदाजीला आला, तेव्हा खेळपट्टी इतकी स्लो होईल याचा आम्हाला अंदाजा नव्हता. मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) आणि वरुण आरोन (Varun Aaron) यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी आणि विश्लेषकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण आले आहे.