- गृहराज्यमंत्री योगेश कदम; तटकरे आणि रामदास कदम यांच्यातील वाद चिघळला
मुंबई : कोकणातील महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत संघर्ष आता विकोपाला गेला आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांच्यात रंगलेल्या शाब्दिक युद्धात आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उडी घेतली असून, 'मी बोलायला लागलो, तर तटकरेंचे पितळ उघडे पडेल,' असा पलटवार त्यांनी केला आहे. तटकरे यांच्या वक्तव्यानंतर आता तडजोडीला कोणतीही जागा उरलेली नसून हा वाद मिटेल असे वाटत नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (Maharashtra Politics)
शिर्डी साई मंदिराबाहेर महिलेवर चाकूने जीवघेणा हल्ला; परिसरात खळबळ मुंबई: साईबाबांच्या शिर्डी मंदिर (Shirdi Temple) परिसरात शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. साई ...
खासदार सुनील तटकरे (Sunil tatkare) यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या बोचऱ्या टीकेनंतर मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) आक्रमक झाले आहेत. माध्यमांशी बोलताना योगेश कदम म्हणाले की, "सुनील तटकरे यांनी जी भाषा वापरली आहे, त्यानंतर कुठेही कॉम्प्रमाईजसाठी जागा राहिलेली नाही. आता हे मिटेल असे मला वाटत नाही. मी त्यांच्यावर तिखट बोलू शकतो आणि त्यांच्याबद्दल तिखट बोलणे म्हणजे सत्य बोलणेच ठरेल. परंतु, मला या विषयाच्या खोलात जायचे नाही." ( Ramdas Kadam)
मागच्या निवडणुकांमधील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत योगेश कदम यांनी तटकरेंना सूचक इशारा दिला. "मागच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये कोणी कोणाला मदत केली, याचे सत्य जर समोर आले, तर अनेकांचे पितळ उघडे पडेल," असे विधान त्यांनी केल्यामुळे महायुतीतील जुने वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Mahayuti)
नेमका वाद काय?
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर, रामदास कदम ( Ramdas Kadam) यांनी तटकरेंवर जहरी टीका केली होती. "सुनील तटकरे जिथे जेवतील तिथेच छेद करतील, अशी त्यांची अवलाद आहे, त्यामुळे त्यांच्या बाबतीत न बोललेलेच बरे," असे विधान रामदास कदम यांनी केले होते. - या विधानाला उत्तर देताना सुनील तटकरे यांनी देखील अतिशय शेलक्या शब्दांचा वापर केला. "पिसाळलेला श्वान चावला की माणूस त्या श्वानाप्रमाणेच बोलतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना ठाण्यातील मनोरुग्णालयात दाखवावे. आधीच मर्कट आणि त्यात दारू प्यायलेला, अशी त्यांची अवस्था झाली आहे," अशी टीका तटकरे यांनी केली होती.






