एकाच कुटुंबातील पाच जण गायब ! पळाले की घातपात ? नेमकं घडलं काय ?

Nagpur : नागपूरच्या धानतोली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच सदस्य २४ जूनपासून बेपत्ता झाले आहेत. मागील ११ दिवसांपासून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. धानतोली पोलीस ठाण्यात पाच जण हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ते शेवटचे पुण्यात राहत असल्याचे समजते.



नेमकं घडलं काय ?


श्यामसुंदर (७१ वर्षीय) आणि त्यांचे भाऊ सुरेश पारसवानी यांचे कुटुंब धानतोली परिसरात एकत्र राहत होते. २४ तारखेला सुरेश पारसवानी यांच्या कुटुंबातील पाच सदस्य कोणालाही न कळवता अचानक घरातून निघून गेले. नातेवाईकांनी या पाच जणांचा सर्वत्र शोध घेतला, ओळखीच्या लोकांची चौकशी केली, परंतु त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.(Lawrence Bishnoi Gang)



बेपत्ता झालेल्या सदस्यांची नावे : हर्षा परसवानी (वय ५७ वर्षे), जितेंद्र परसवानी (वय ४२ वर्षे), इशिता परसवानी (वय ४० वर्षे), खुशी परसवानी (वय २१ वर्षे), कृष्णा परसवानी (वय १२ वर्षे)



पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, बेपत्ता असलेल्या सदस्यांपैकी एकावर मोठ्या प्रमणावर कर्जाचा डोंगर असल्याची माहिती समोर आली आहे. कर्जाच्या बोजाला कंटाळून या कुटुंबाने घर सोडले की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या मोबाईल नंबरची तांत्रिक तपासणी(Technical Analysis) केली असता, सर्वांचे शेवटचे लोकेशन पुणे येथील आहे. हे सर्वजण स्वतःहून पुण्यात गेले की त्यांच्यासोबत काही घातपात झाला आहे? याचा तपास सध्या धानतोली पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल

Jalgaon Crime : जळगावात दूध विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा बडगा, ७ जणांवर कारवाई

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दुधाची मागणी वाढत असताना अनधिकृत विक्री आणि भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Eknath Shinde : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी, ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती ठाणे : ८० व्या