एकाच कुटुंबातील पाच जण गायब ! पळाले की घातपात ? नेमकं घडलं काय ?

Nagpur : नागपूरच्या धानतोली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच सदस्य २४ जूनपासून बेपत्ता झाले आहेत. मागील ११ दिवसांपासून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. धानतोली पोलीस ठाण्यात पाच जण हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ते शेवटचे पुण्यात राहत असल्याचे समजते.



नेमकं घडलं काय ?


श्यामसुंदर (७१ वर्षीय) आणि त्यांचे भाऊ सुरेश पारसवानी यांचे कुटुंब धानतोली परिसरात एकत्र राहत होते. २४ तारखेला सुरेश पारसवानी यांच्या कुटुंबातील पाच सदस्य कोणालाही न कळवता अचानक घरातून निघून गेले. नातेवाईकांनी या पाच जणांचा सर्वत्र शोध घेतला, ओळखीच्या लोकांची चौकशी केली, परंतु त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.(Lawrence Bishnoi Gang)



बेपत्ता झालेल्या सदस्यांची नावे : हर्षा परसवानी (वय ५७ वर्षे), जितेंद्र परसवानी (वय ४२ वर्षे), इशिता परसवानी (वय ४० वर्षे), खुशी परसवानी (वय २१ वर्षे), कृष्णा परसवानी (वय १२ वर्षे)



पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, बेपत्ता असलेल्या सदस्यांपैकी एकावर मोठ्या प्रमणावर कर्जाचा डोंगर असल्याची माहिती समोर आली आहे. कर्जाच्या बोजाला कंटाळून या कुटुंबाने घर सोडले की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या मोबाईल नंबरची तांत्रिक तपासणी(Technical Analysis) केली असता, सर्वांचे शेवटचे लोकेशन पुणे येथील आहे. हे सर्वजण स्वतःहून पुण्यात गेले की त्यांच्यासोबत काही घातपात झाला आहे? याचा तपास सध्या धानतोली पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या

Amravati News : धक्कादायक! आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जेवणानंतर उलट्या, पोटदुखीने उडाली खळबळ

अमरावती : अमरावतीच्या मेळघाट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय

Mumbai-Pune Water Update : मुंबई-पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! धरणांत मुबलक जलसाठा; पाहा कोणत्या तलावात किती टक्के पाणी ?

मुंबई : यंदाच्या मान्सूनने सुरुवातीला हुलकावणी दिली असली, तरी जुलै महिन्यात मुंबई (Mumbai) आणि पुण्याच्या पाणलोट

Ashadhi Ekadashi 2026 : विठ्ठलाच्या मूर्तीवरील प्रत्येक खूण सांगते एक कथा! जाणून घ्या दडलेले आध्यात्मिक अर्थ

विठ्ठलाच्या (Vitthal) मूर्तीवरील प्रत्येक खूण का आहे खास? https://prahaar.in/2026/07/25/pune-metro-news-hinjawadi-shivajinagar-pune-metro-li

Pune Metro : IT कर्मचाऱ्यांची ट्रॅफिकमधून सुटका! हिंजवडी मेट्रोला अखेर 'ग्रीन सिग्नल'; माण ते बालेवाडी प्रवासी सेवेचा मार्ग मोकळा

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीची डोकेदुखी ठरलेल्या हिंजवडी IT पार्कच्या प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठी