Devendra Fadnavis : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांच्या निधनावर मुख्यमंत्री फडणवीसांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

नागपूर : विदर्भातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूरावजी तिडके यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या सार्वजनिक जीवनावर शोककळा पसरली असून विविध स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाबूरावजी तिडके यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, बाबूरावजी तिडके यांनी नागपूर जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देण्याबरोबरच शिक्षण, सहकार आणि समाजकारणाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे अनेक कार्यकर्त्यांची राजकीय जडणघडण झाली आणि त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वातून अनेकांना प्रेरणा मिळाली.



मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, अलीकडेच बाबूरावजी तिडके यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेण्याचा योग आला होता. त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे आणि अभ्यासू नेतृत्वामुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान होते.


"बाबूरावजी तिडके यांच्या निधनाने विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातील एक उमदे, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत," अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



बाबूरावजी तिडके यांनी राजकारणासोबतच समाजसेवा, शिक्षण आणि सहकार क्षेत्रात दीर्घकाळ मोलाचे कार्य केले. त्यांच्या निधनामुळे विदर्भातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (Devendra Fadnavis)




Comments
Add Comment

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या

Amravati News : धक्कादायक! आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जेवणानंतर उलट्या, पोटदुखीने उडाली खळबळ

अमरावती : अमरावतीच्या मेळघाट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय

Mumbai-Pune Water Update : मुंबई-पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! धरणांत मुबलक जलसाठा; पाहा कोणत्या तलावात किती टक्के पाणी ?

मुंबई : यंदाच्या मान्सूनने सुरुवातीला हुलकावणी दिली असली, तरी जुलै महिन्यात मुंबई (Mumbai) आणि पुण्याच्या पाणलोट

Ashadhi Ekadashi 2026 : विठ्ठलाच्या मूर्तीवरील प्रत्येक खूण सांगते एक कथा! जाणून घ्या दडलेले आध्यात्मिक अर्थ

विठ्ठलाच्या (Vitthal) मूर्तीवरील प्रत्येक खूण का आहे खास? https://prahaar.in/2026/07/25/pune-metro-news-hinjawadi-shivajinagar-pune-metro-li

Pune Metro : IT कर्मचाऱ्यांची ट्रॅफिकमधून सुटका! हिंजवडी मेट्रोला अखेर 'ग्रीन सिग्नल'; माण ते बालेवाडी प्रवासी सेवेचा मार्ग मोकळा

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीची डोकेदुखी ठरलेल्या हिंजवडी IT पार्कच्या प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठी