नवी दिल्ली : पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेल्या कैलास मानसरोवर यात्रेबाबत (Kailash Mansarovar Yatra 2026) परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) भाविकांसाठी महत्त्वाची सूचना (अॅडव्हायझरी) जारी केली आहे. नेपाळमध्ये अनेक भारतीय भाविक अडकल्याच्या घटनांनंतर मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, चीनमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेला व्हिसा आणि परवाने (परमिट) नसताना यात्रा सुरू करणे गंभीर अडचणींचे कारण ठरू शकते. मंत्रालयाने भाविकांना केवळ अधिकृत टूर ऑपरेटरमार्फतच यात्रा करण्याचे आणि सर्व आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतरच घरातून प्रस्थान करण्याचे आवाहन केले आहे. (Kailash Mansarovar Yatra 2026)
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, नेपाळमध्ये अडकलेल्या अनेक भारतीय नागरिकांकडून मदतीच्या विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. हे भाविक खासगी टूर ऑपरेटरमार्फत कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. मात्र, त्यांच्याकडे चीनमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेला व्हिसा आणि परवानगीपत्रे नव्हती. आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे त्यांना पुढील प्रवास सुरू ठेवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण यात्रेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे हाती आल्यानंतरच भारतातून प्रवास सुरू करावा. पुढे जाऊन व्हिसा किंवा परवानगी मिळेल, या आशेवर यात्रा सुरू केल्यास भाविक अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतरच यात्रेला सुरुवात करावी. (Kailash Mansarovar Yatra 2026)
परराष्ट्र मंत्रालयाने भाविकांना यात्रा बुक करण्यापूर्वी संबंधित टूर ऑपरेटर विधिवत नोंदणीकृत आणि अधिकृत असल्याची खात्री करण्याचा सल्ला दिला आहे. अधिकृत टूर ऑपरेटरमार्फत प्रवास केल्यास कागदपत्रांची प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण होते आणि प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा अनावश्यक जोखमीपासून बचाव होतो. (Kailash Mansarovar Yatra 2026)
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने तब्बल ...
कोरोना महामारी आणि भारत-चीन सीमावादामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर २०२० पासून बंद असलेली कैलास मानसरोवर यात्रा पाच वर्षांनंतर २०२५ मध्ये पुन्हा सुरू झाली आहे.यंदा सलग दुसऱ्या वर्षी २०२६ मध्येही ही यात्रा सुरू आहे. (Kailash Mansarovar Yatra 2026)
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, यंदाची यात्रा ४ जुलै ते २६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पार पडत आहे. यात्रा दोन पारंपरिक मार्गांद्वारे आयोजित करण्यात आली आहे. पहिला मार्ग उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून, तर दुसरा मार्ग सिक्कीममधील नाथू ला खिंडीतून जातो. या यात्रेची पुनर्बहाली भारत-चीन संबंध सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.
विनाशकारी भूकंपाच्या तडाख्यातून अद्याप सावरत नसलेल्या व्हेनेझुएलाला शनिवारी (२७ जून) पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. राजधानी काराकासपासून ...