नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला  आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, राणेनगर ते इंदिरानगर दरम्यान महामार्गावरील उड्डाणपुलाचे रुंदीकरण आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामावर मध्यप्रदेशातील पुरानाखेडा येथील रहिवासी नन्नेभाई भगवानदास आदिवासी (वय ५६) आणि त्यांच्या पत्नी राधारानी नन्नेभाई आदिवासी (वय ५५) हे दोघे मजूर म्हणून कार्यरत होते.



शुक्रवारी दि. २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हे दाम्पत्य आपली कामाची पाळी संपवून रस्ता ओलांडत होते. दरम्यान, पाथर्डी फाट्याकडून द्वारकाच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एमएच १५ एचएम २१५३ क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघेही रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री नन्नेभाई आदिवासी यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर शनिवारी पहाटे राधारानी आदिवासी यांनीही उपचारांना प्रतिसाद न देता अखेरचा श्वास घेतला.



या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या प्रकरणी अंबड पोलिसांनी अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली असून, संबंधित कार चालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक हारून शेख हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलीस या घटनेतील कार चालकाचा शोध घेत असून, अपघाताच्या वेळी नेमकी कोणाची चूक होती, याचा तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे

महापालिकेच्यावतीने पाणी आणि अन्नाची शुद्धता तपासणी

अहवाल आता व्हॉट्सअॅप, ईमेलवर प्राप्त होणार मुंबई : पाणी आणि अन्न हे आपल्या रोजच्या जगण्यातील अविभाज्य घटक आहेत.