DCM Eknath Shinde : काल 'जोर का झटका लगा', यानंतर आणखी झटके लागणार!

विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; प्रश्न विचारून पळ काढणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये


मुंबई : "विरोधकांकडचे मुद्दे संपले असून पराभवाच्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. काल जो त्यांना जोर का झटका धीरे से लागला, त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे आणि पुढे आणखी झटके बसणार आहेत," असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केला.


अध्यक्षांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना फटकारताना शिंदे म्हणाले की, सभागृहाचे कामकाज पूर्णपणे नियमांनुसार चालत असून अध्यक्षांनी विरोधकांना प्रश्न मांडण्यासाठी भरपूर संधी दिली आहे. तरीही प्रश्नांची उत्तरे ऐकण्याऐवजी गोंधळ घालणे आणि स्टंटबाजी करणे एवढाच विरोधकांचा कार्यक्रम राहिला आहे, अशी टीका त्यांनी केली. विरोधकांच्या अनुपस्थितीवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की, सरकारला प्रश्न विचारायचे आणि उत्तराची वेळ आली की सभागृहातून बाहेर पडायचे, ही विरोधकांची जुनी सवय आहे. "प्रश्न विचारून पळ काढणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये," असा टोला लगावत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेची खिल्ली उडवली.



शेतकरी प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांनाही शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत ४५ हजार कोटी रुपयांची मदत दिली असून नुकसानभरपाईचे निकष बदलून दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. "शेतकऱ्यांवर अन्याय झाला, सरकारने मदत केली नाही, हा विरोधकांचा दावा म्हणजे निव्वळ दिशाभूल आहे. महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. विरोधकांची राजकीय स्पेस दिवसेंदिवस कमी होत आहे, तर महायुतीवरील जनतेचा विश्वास वाढत आहे," असा टोला त्यांनी लगावला.


सभागृहाच्या पावित्र्याचा मुद्दा उपस्थित करताना शिंदे यांनी अध्यक्षांच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना सुनावले. अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल करत त्यांनी विरोधकांना खडसावले. २०१९ ते २०२२ या काळात विरोधी पक्षातील अनेक नेते सभागृहात नियमित उपस्थित राहत नसत, याची आठवण करून देत शिंदे यांनी विरोधकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. "जो शीशे के घर में रहते हैं, वो दुसरों के घर पर पत्थर नहीं मारते," असे म्हणत त्यांनी विरोधकांना आरसा दाखवला.

Comments
Add Comment

Maharashtra Vidhan Bhavan : विधान मंडळ सचिवालयातील १८ अधिकाऱ्यांना पदोन्नती

मुंबई : महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील उपसचिव, अवर सचिव, अवर सचिव (समिती) आणि कक्ष अधिकारी अशा एकूण १८ पदांवर

Eknath Shinde : जालना घनसावंगीतील शेतकऱ्यांना विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याचे निर्देश

जालना-नांदेड समृद्धी महामार्गाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा ठाणे : जालना

Chandrashekhar Bawankule : आमचा 'शेर' महाराष्ट्रात प्रचंड ताकद निर्माण करतोय!

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार - नितेश राणे

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Sumantrao Pendharkar : 'विको'ला जागतिक ओळख देणारे उद्योगरत्न सुमंतराव पेंढरकर यांचे निधन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : प्रसिद्ध आयुर्वेदिक उत्पादन कंपनी 'विको लॅबोरेटरीज'ला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे उद्योगपती आणि

Bank Election : परभणी बँकेच्या सत्तेत मोठा उलटफेर! १४ वर्षांनंतर चित्र बदलले, दिग्गजांना मागे टाकत बोर्डीकर पुन्हा सत्ताधीश!

परभणी: राजकीय वर्तुळात अनेकदा "वेळ प्रत्येकाची येते" असे म्हटले जाते, आणि परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी