मुंबई : भारतीय संघातील स्टार खेळाडू मोहम्मद सिराज (Mohammad Siraj),तिलक वर्मा (Tilak Varma) आणि माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू (Ambati Rayudu) हे तिघेही आता मोठ्या अडचणीत सापडले आहेत.या तिघांना टीसीएसने नोटीस बजावली आहे. टीजी २० लीग'ची नोंदणी झालेली नसतानाही मोहम्मद सिराज, तिलक वर्मा आणि अंबाती रायडूने त्याची जाहिरात केली.यावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे.
मुंबई : उबाठा गटातील सर्व ६ बंडखोर खासदारांना 'वाय+' दर्जाची(Y Plus Security) विशेष सुरक्षा व्यवस्था मंजूर करण्यात आली आहे. फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात उमटू ...
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा क्रिकेट असोसिएशनकडे टी- २० स्पर्धेची नोंदणी झालेली नाही. तरीही मोहम्मद सिराज, तिलक वर्मा आणि अंबाती रायडू या तीन भारतीय खेळाडूंनी लीगची जाहिरात आणि प्रमोशन केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) या खेळाडूंना या जाहिरातींसाठी तसेच प्रमोशनच्या कामांसाठी परवानगी मिळाली नव्हती. बीसीसीआयच्या नियमांनुसार, त्यांच्या परवानगी शिवाय कोणत्याही क्रिकेट लीगचे आयोजन करणे किंवा त्याचे प्रमोशन करणे हा नियमांचा भंग मानला जातो.या प्रकरणात केवळ क्रिकेटपटूच नाही, तर चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारही अडकले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि व्यंकटेश यांनीही या लीगचे प्रमोशन केले. त्यामुळे तेलंगणा क्रिकेट असोसिएशनने या दोन्ही अभिनेत्यांनाही नोटीस पाठवली आहे.
Mumbai : भारतीय महिला संघाने टी २० विश्वचषकात (Womens T20 World Cup 2026) दोन्ही सामने जिंकून दमदार सुरुवात केली आहे. मात्र,आता संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अ ...
कारवाई होण्याची शक्यता ?
मोहम्मद सिराज,तिलक वर्मा किंवा अंबाती रायडू या तिघांपैकी कोणीही अद्याप संपूर्ण प्रकरणावर किंवा मिळालेल्या नोटीसवर प्रतिक्रिया दिलेला नाही. बीसीसीआयच्या परवानगीशिवाय लीगला प्रोत्साहन दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.