Navneet Rana : राष्ट्रवादी प्रवेशाच्या अटीमुळे राज्यसभा हुकली

मुंबई : "राज्यसभेच्या रिक्त जागेवर मला उमेदवारी देण्याची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली होती. मात्र, त्यासाठी त्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट घातली होती, जी मला मान्य नव्हती. मी कोणत्याही पदासाठी माझी विचारधारा बदलणार नाही," असा खुलासा भाजपच्या नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी महायुतीकडून राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.बारामती पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आणि नियमानुसार राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या या एका जागेसाठी निवडणूक जाहीर झाली होती. महायुतीकडून राष्ट्रवादीने या जागेवर राजेंद्र जैन यांचा एकमेव वैध अर्ज दाखल झाला असल्याने जैन यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.


दरम्यान, या जागेसाठी नवनीत राणा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. स्वतः राणा यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. या घडामोडींवरून पडदा उठवताना राणा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून सविस्तर भूमिका मांडली आहे. "आमचे मार्गदर्शक व मुख्यमंत्री 'देवाभाऊ' (देवेंद्र फडणवीस) यांनी सुनेत्रा वहिनींना ही जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याबाबत विनंती केली होती, मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ते शक्य झाले नाही," अशी माहिती राणा यांनी दिली.



नेमके काय घडले?


पवार कुटुंबाकडून मिळालेल्या प्रस्तावाबाबत बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, "माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून सुनेत्रा वहिनी आणि पार्थ दादा पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याची इच्छा दाखवली, याबद्दल मी त्यांची आभारी आहे. पण उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी भाजपची निष्ठावान कार्यकर्ती आहे. त्यामुळे पदासाठी पक्ष बदलणार नाही."

Comments
Add Comment

Good Hair : केस गळतायत? मग आहारात नक्की समाविष्ट करा 'हे' ८ पदार्थ; केस होतील मजबूत आणि दाट

मुंबई : बदलती जीवनशैली, ताणतणाव, प्रदूषण आणि अयोग्य आहार यामुळे केस गळणे, केस पातळ होणे आणि अकाली पांढरे होणे या

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

Crime News : सिंगापूरमध्ये बनावट हिऱ्याच्या मदतीने 2 लाख डॉलरच्या हिऱ्याची चोरी; दोन भारतीयांना अटक

नवी दिल्ली : सिंगापूरच्या चायनाटाउनमधील एका दागिन्यांच्या दुकानातून सुमारे 2 लाख सिंगापूर डॉलर (1.54 लाख अमेरिकी

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Uniform Civil Code : मध्यप्रदेश विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक मंजूर

भोपाळ : मध्यप्रदेश विधानसभेत मोठ्या गदारोळात समान नागरी संहिता (ucc) विधेयक मंजूर करण्यात आले. उत्तराखंड, गुजरात

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक