Bharat Bhagy Vidhata Movie:  ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटावर नर्सेस संघटनेचा आक्षेप; प्रदर्शनापूर्वीच निर्माण झाला वाद

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) आगामी ‘भारत भाग्य विधाता’ (Bharat Bhagy Vidhata) हा चित्रपट सध्या चर्चेत असून प्रदर्शनापूर्वीच तो वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. २ जून रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून १२ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र ट्रेलरमधील काही दृश्ये आणि संवादांवर नर्सेस संघटनांनी आक्षेप घेतला आहे.


‘भारत भाग्य विधाता’ हा चित्रपट २००८ मधील मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. कामा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या धैर्याची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. कंगना रणौतसोबत मराठी अभिनेत्री गिरीजा ओक हिनेही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली असून दोघी नर्सच्या भूमिकेत दिसणार आहेत.


चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने काही दृश्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ट्रेलरमधील काही संवाद आणि प्रसंगांमुळे नर्सेसच्या व्यवसायाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवली जात असल्याचा दावा संघटनेने केला आहे. नर्स हा आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा आणि सन्माननीय घटक असल्याने अशा प्रकारचे चित्रण समाजात चुकीचा संदेश देऊ शकते, असे संघटनेचे म्हणणे आहे.


यासंदर्भात फेडरेशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून चित्रपटातील आक्षेपार्ह वाटणारे संवाद आणि दृश्यांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. तसेच चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी तो नर्सेस संघटनांच्या प्रतिनिधींना दाखवावा आणि त्यांच्या सूचनांचा विचार करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.


दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांकडून किंवा कलाकारांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या वादावर पुढे काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

'Deool Band 2' Box Office Collection : मराठी सिनेमाचा नवा विक्रम? 'देऊळ बंद २'ची १०० कोटींच्या दिशेने दमदार वाटचाल!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित आणि अभिनित 'देऊळ बंद २' (Deool Band 2) चित्रपटाची जोरदार

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

रंगात आलेला प्रयोग राजवाडेंनी थांबवला; कारण...

नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे.

ग्रामीण मनोरंजनासाठी ‘किस्सा शुरू टॉकीज’!

ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने नवीन चित्रपट पाहण्यासाठी

Deepa Sawant-Khot : मर्डर मिस्ट्रीची ‘तलास’

कलेची आवड माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळे कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यातून मार्ग काढून त्या कलेची

Usha Nadkarn : स्पष्ट बोलण्यास कारण की...

स्पष्टवक्तेपणा या स्वभावामुळे मराठी कलाक्षेत्रात ज्या दोन व्यक्तींना प्रामुख्याने ओळखले जाते; त्या वक्ती