Me Savitribai Jotirao Phule : 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितले बंद होण्यामागचे कारण

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेबाबत विविध चर्चा सुरू होत्या. अखेर मालिकेचे निर्माते आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. १४ जून रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. समाजातील अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि शिक्षणाचा अभाव याविरोधात फुले दाम्पत्याने दिलेला लढा या मालिकेतून दाखवण्यात आला. मात्र आता त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावरच ही मालिका संपणार आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले की, मालिका बंद करण्याचा निर्णय वाहिनीचा आहे. मालिकेच्या निर्मितीसाठी होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यामध्ये समतोल राहत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांना कळवण्यात आले. सध्या सुरू असलेल्या कालखंडापर्यंतच कथा दाखवण्याचे ठरवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

मालिका संपत असल्याबद्दल खंत व्यक्त करताना त्यांनी फुले दाम्पत्याच्या कार्याचा उल्लेख केला. शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या या महान व्यक्तींच्या जीवनावरील मालिका इतक्या कमी भागांमध्ये संपत असल्याचे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या विचारांची आणि कार्याची अधिक व्यापक मांडणी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, मालिका बंद होत असली तरी फुले दाम्पत्याची कथा इथेच थांबणार नसल्याचे डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात एका नव्या माध्यमातून आणि वेगळ्या स्वरूपात ही कथा पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या विषयावर आधारित नवा प्रकल्प लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरु असल्याने सोशल मीडियावर अनेकांनी खंत व्यक्त केली आहे.
Comments
Add Comment

Deool Band 2 : प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' ची गगणभरारी ; ११ दिवसात केली 'इतक्या' कोटींची कमाई !

बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाचा डंका पाहायला मिळत आहे. चित्रपटाने वीकेंडला बंपर कमाई केली.

Pooja Bhatt : पूजा भटनं सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण, म्हणाली.......

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट करिअरपेक्षा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. अनेक

Sobhita Dhulipala : नागा चैतन्यासोबतच्या नात्यावर होणाऱ्या ट्रॉलिंगवर पहिल्यांदाच बोलली सोभिता धूलिपाला ; म्हणाली..

सोभिता धूलिपाला व नागा चैतन्या यांचे नाते नेहमी चर्चेत राहिले आहे. समांथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर नागा

Karishma Kapoor : ‘मेंटलहुड’ नंतर करिश्मा कपूर पुन्हा एकदा थरारक क्राइम सिरीजमध्ये ; ट्रेलर बघून चर्चेला उधाण!

मुंबई : 'मर्डर मुबारक' नंतर दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे.‘मेंटलहुड’ नंतरचा हा

Swapnil Joshi : स्वप्नील जोशीने मध्येच थांववला शो, माफी मागत म्हणाला.. !

एखाद्या नाटकात कलाकाराला प्रेक्षकांमुळे होणारा त्रास हा फारसा नवा नाही. प्रेक्षकांचे वाजणारे फोन आणि मोठ्याने

Jacqueline Fernandez : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस अडचणीत; कोर्टाचे महत्त्वाचे आदेश!

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिला २०० कोटी रुपयांच्या कथित फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग