विधान परिषदेचा जागावाटपाचा तिढा सुटेना

 रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट


मुंबई : विधान परिषदेच्या १६ रिक्त जागा आणि एका पोटनिवडणुकीसाठी जाहीर झालेल्या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये निर्माण झालेला जागावाटपाचा तीढा आद्यप सुटण्याची चिन्हे नाहीत. भाजपने १२ जागांवर दावा ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) १ आणि शिवसेनेला ४ जागांची ऑफर दिली आहे. मात्र, या फॉर्म्युलाला शिवसेनेने नकार दिला असून, आपल्याला किमान ७ जागा मिळाव्यात, या मागणीवर ते ठाम आहेत. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाणे, पालघर, नाशिक, कोकण (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), जळगाव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आणि हिंगोली या मतदारसंघांवर दावा केला आहे. यातील किमान ६ जागा तरी पदरात पडल्याच पाहिजेत, असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांनी धरला आहे. मात्र, भाजप सध्यातरी केवळ ४ जागा देण्यावरच ठाम आहे. महायुतीमधील या मतभेदामुळे शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी थेट 'स्वबळा'वर लढण्याचा आग्रह वरिष्ठांकडे धरला आहे. तथापि, संभाव्य राजकीय नुकसान टाळण्यासाठी शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व युती टिकवून तोडगा काढण्याच्या बाजूने आहे.


कोकणच्या जागेवरून चुरस


जागावाटपात काही जागांची अदलाबदली होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असली, तरी 'रायगड'च्या जागेवरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे. या जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही घटक पक्षांनी दावा केला आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या मुलाला राजकीय संधी देण्यासाठी ही जागा शिवसेनेला सुटावी म्हणून सर्व ताकद पणाला लावली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. दुसरीकडे, उबाठा गटातून शिवसेनेत प्रवेश केलेले राजापूरचे ज्येष्ठ नेते राजन साळवी या निवडणुकीच्या निमित्ताने कमालीचे सक्रिय झाले आहेत. या विधान परिषद निवडणुकीत पक्षाने आपल्याला संधी द्यावी, अशी तीव्र इच्छा साळवी यांनी नेतृत्वाकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांना सामावून घेण्यासाठी कोकणच्या जागेबाबत काय निर्णय होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Comments
Add Comment

Kalyan Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीत पावसाची दाणादाण : नाले ओव्हरफ्लो, घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ

कल्याण : कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन

Nashik : अंजनेरी, ब्रह्मगिरीसह सर्व पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद, वनविभागाचा मोठा निर्णय; नाशिकमध्ये रेड अलर्ट

Nashik : नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोर धरला असून घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. संभाव्य

Ajit Pawar Birth Anniversary : अजित पवारांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभरात 'जनसेवा सप्ताह'

- प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती; २२ ते २६ जुलै या कालावधीत आयोजन मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली

Casting couch : इंडस्ट्रीमध्ये आधी शारीरिक सुखाची मागणी व्हायची आता, थेट…, अभिनेत्रीने सर्वच सांगून टाकलं

Casting couch : फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मेहनतीच्या जोरावर अनेक जण हे शिखर गाठतातही. पण

Maharashtra Monsoon Session 2026 : अधिवेशनाला येणाऱ्या मंत्री, आमदारांनाही पावसाचा फटका; कामकाज स्थगित

- रस्ते, रेल्वे मार्ग बंद, विमान सेवा विलंबाने, अनेकांनी मतदारसंघात राहणे केले पसंत मुंबई : मुंबईसह राज्यभरात सुरू