Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाचा पुढाकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मंत्री नितेश राणेंचा मोठा निर्णय


मुंबई : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या इंधन संकटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिलेल्या सूचनेनुसार, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आपल्या विभागासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असून, विभागाच्या सर्व बैठका आता 'ऑनलाइन' पद्धतीने घेण्याचे निर्देश दिले आहेत.



इंधनावरील खर्च कमी करणे आणि परकीय चलनाची बचत करणे या हेतूने मंत्री नितेश राणे यांनी हा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्या मुंबईतील मंत्रालय किंवा इतर ठिकाणच्या बैठकांसाठी अधिकाऱ्यांना प्रवास करावा लागणार नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कामकाज उरकण्यावर भर दिला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी विभागात तातडीने सुरू करण्यात आली असून, यामुळे इंधन बचतीसोबतच प्रशासकीय कामाचा वेगही वाढणार आहे.


इलेक्ट्रिक वाहनांवर भर

त्याशिवाय पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विभागात जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांचा (ईव्ही) वापर करण्याच्या सूचनाही नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. "ऊर्जा बचत हे राष्ट्रीय कर्तव्य असून पर्यावरणाचे रक्षण आणि देशाची आर्थिक स्थिती संतुलित राखण्यासाठी प्रत्येक विभागाने अशी पावले उचलणे गरजेचे आहे," असे मत राणे यांनी यावेळी व्यक्त केले.

Comments
Add Comment

ST BUS : आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास मुंबई : ‘पंढरीची वारी’ (Pandharpur Wari) ही

Commonwealth Games 2026 : ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतानं जिंकली ३९ पदकं, समारोप सोहळ्यात दिसेल अहमदाबाद २०३० ची झलक

ग्लासगो : स्कॉटलँडच्या ग्लासगो शहरात सुरू असलेल्या राष्ट्रकुल २०२६ अर्थात

Commonwealth Games 2026 : भूसुरुंगाच्या स्फोटात पाय गमावला, पण जिद्द सोडली नाही; बॉक्सर ते सुवर्णपदक विजेता ठरलेला सोमन राणा

ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आपल्या प्रेरणादायी प्रवासातून संपूर्ण

India-China Border : नाथुला खिंडीतून ६ वर्षांनंतर भारत-चीन सीमा व्यापार पुन्हा सुरू

सिक्किम : कोविड-१९ महामारी आणि त्यानंतरच्या सीमा तणावामुळे २०२० पासून बंद असलेला भारत-चीन सीमा व्यापार तब्बल ६

Friendship Day 2026 : मैत्री दिनानिमित्त; बजेट फ्रेंडली गिफ्ट्स ऑप्शन

 तुमच्या मित्रासाठी एखादे खास सरप्राइज शोधत आहात? ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ५ उत्तम भेटवस्तू... मैत्री हे

BMC NEWS : दादरमध्ये मॅनहोलची जाळी चोरीचा प्रयत्न फसला, झाकण टाकले उघडे

महापालिका कर्मचारी नगरसेवकाच्या प्रसंगावधनाने त्वरीत बसवले