BMC News : महापालिकेत ठरावाच्या सूचना बाद होण्याची हॅट्रीक

सलग तिसऱ्या महिन्यात ठरावाच्या सूचना सभागृहात झाल्या रद्द


मुंबई (सचिन धानजी)


तब्बल पावणे चार वर्षांनंतर निवडणूक पार पडून भाजप शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेत (BMC) आली. परंतु ही सत्ता आल्यानंतर, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या मासिक सभांचे आयोजन करून नगरसेवकांनी केलेल्या सूचनांचे ठराव महापालिका सभागृहात पटलावर मंजूरीसाठी ठेवण्यात आले होते. परंतु या तिन्ही महिन्यांमध्ये ठरावाच्या सूचनांसाठी निश्चित केलेल्या दिवशी कामकाज न झाल्यामुळे नगरसेवकांनी मांडलेल्या सर्व सूचना बाद झाल्या आहेत. सलग तिसऱ्या महिन्यांतही ठरावाच्या सूचनांचा दिवस रद्द झाल्यामुळे सूचनांचे ठराव बाद होण्याची हॅट्रीकच पूर्ण झाली आहे. त्यामुळे महापालिकेत महायुतीची सत्ता आली असली तरी नगरसेवकांच्या सूचनांसाठी काही दिवस उजाडत नाही,असे चित्र दिसून येत आहे.



मुंबई महापालिकेचा कारभार अधिक चांगल्याप्रकारे करता यावा आणि विविध योजना तसेच सूधारणा सुचवण्याच्या दृष्टीकोनातून नगरसेवकांकडून ठरावाच्या सूचना मांडल्या जातात. नगरसेवकांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनांसाठी महापौर हे पिठासीन अधिकारी म्हणून एक निश्चित दिवस जाहीर करतात. परंतु या निश्चित दिवशी सभा तहकूब झाल्यास किंवा सभेचे कामकाज रद्द झाल्यास त्या दिवशी विचारात घेतल्या जाणाऱ्या ठरावाच्या सूचना या रद्द होतात.


मार्च महिन्यात नवनिर्वाचित नगरसेवकांनी तब्बल २९ ठरावाच्या सूचना मांडल्या होत्या, यासाठी २३ मार्चची तारीख निश्चित केली होती. परंतु माजी नगरसेविका अलका केरकर यांचे निधन झाल्यामुळे दुखवटा व्यक्त करण्यासाठी ठरावाच्या सूचनेच्या दिवशी शोक प्रस्ताव मांडून सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे ज्या ठरावाच्या सूचनांमध्ये सभेच्या कामकाजात ठरावाची सूचनेवर विचार न झाल्यास फेरविचारासाठी पुढील महिन्याच्या पटलावर घेण्यात याव्यात असे ज्या नगरसेवकांनी आपल्या सूचनेत नमुद केले होते, त्यांच्या सूचना पुन्हा स्वीकारल्या. आणि बाकीच्यांच्या सूचना बाद करण्यात आल्या. त्यामुळे ज्यांनी पुन्हा या सूचना मांडल्या त्यांच्या पुढील एप्रिल महिन्यात विचारात घेण्यात आल्या आणि नव्यानेही मांडण्यात आल्या. यामध्ये एप्रिल महिन्यात या ६६ सूचना महापालिका सभागृहाच्या पटलावर मांडण्यात आल्या होत्या. यासाठी १३ एप्रिलचा दिवस निश्चित करण्यात आला होता. परंतु याही दिवशी गानसम्राज्ञी आशाताई भोसले यांच्या निधनामुळे शोक प्रस्ताव मांडून सभेचे कामकाज तहकूब करण्यात आल्या. त्यामुळे यातील काही ठरावाच्या सूचना पुढील महिन्यात म्हणजे मे मध्ये विचारात घेण्यात आल्या. त्यामुळे मे महिन्यात महापालिकेच्या पटलावर १४४ तसेच अतिरिक्त ०८ अशाप्रकारे एकूण १५२ ठरावाच्या सूचना मांडण्यात आल्या होत्या. यातील ७२ ठरावाच्या सूचना या मे महिन्यात नव्याने मांडण्यात आल्या होत्या. यासाठी मे महिन्यातील ०७ तारीख ही ठरावाच्या सूचना विचारात घेण्यासाठी निश्चित करण्यात आली होती. परंतु व्हिएतनामचे पंतप्रधान येणार असल्याने महापौरांनी ०७ मे रोजी निश्चित केलेल्या सभागृहाचे कामकाज रद्द केले. त्यामुळे निश्चित केलेल्या ठरावाच्या सूचनांच्या दिवशी कामकाज न झाल्यास त्या दिवशी असलेल्या सर्व ठरावाच्या सूचना बाद होतात. त्यानुसार पटलावर ठेवण्यात नगरसेवकांनी मांडलेल्या १५२ ठरावाच्या सूचना बाद झाल्या आहेत. सलग तिसऱ्या महिन्यांमध्ये ठरावाच्या सूचनांदिवशी कामकाज न झाल्यामुळे ठरावाच्या सूचना बाद होण्याची हॅट्रीक महापालिकेने साधली असून अशाप्रकारे सलग तिन वेळा ठरावाच्या सूचनांच्या दिवशी कामकाज न होण्याचे प्रकार महापालिकेच्या इतिहासात प्रथमच घडत असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

Dipali sayyad : रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवरून दीपाली सय्यद यांना धमक्या; म्हणाल्या, न घाबरता 'ती' भूमिका...महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वरून वाद पेटला!

मुंबई : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कृत्यांचा आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाचा पर्दाफाश

विस्तारित मेट्रो लाईन ५- ठाणे,भिवंडी,उल्हासनगरमधील कनेक्टिविटी अधिक सक्षम, ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती

मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाईन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प

Nitesh Rane Water Metro : पहिली 'वॉटर मेट्रो' मुंबईत दाखल !

मंत्री नितेश राणे यांनी दिली खुशखबर; 'कॅन्डेला पी-१२' बोटीच्या चाचण्यांना जूनमध्ये सुरुवात मुंबई : मुंबईकरांचा

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू