Mumbai's water metro : मुंबईच्या वॉटर मेट्रोला 'नॉर्वे'चे सागरी तंत्रज्ञान

 १० नवीन जलमार्ग आणि ४५ टर्मिनल्सचे जाळे; महाराष्ट्र सागरी मंडळाचा 'हायके' कंपनीशी करार


मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी 'मुंबई वॉटर मेट्रो' प्रकल्पाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित 'मे. हायके एएस' या प्रगत सागरी तंत्रज्ञान कंपनीदरम्यान गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. या प्रकल्पामुळे मुंबईत आधुनिक, शाश्वत आणि पर्यावरणपूरक जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.


वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह नॉर्वे आणि स्वीडनचे राजनैतिक अधिकारी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मुंबई वॉटर मेट्रोसाठी मे. कोची मेट्रो रेल लि. यांच्यामार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार, सध्या प्रवासी वाहतूक सुरू असलेल्या २१ जलमार्गांवरील २४ टर्मिनल्सचे संपूर्ण अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे.


त्याशिवाय मुंबईच्या किनाऱ्यावर नव्याने १० जलमार्ग सुरू करण्यात येणार असून, त्याअंतर्गत २१ नवीन टर्मिनल्सची निर्मिती प्रस्तावित आहे. यात नॉर्वेच्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषणमुक्त आणि जलद प्रवासी वाहतुकीवर भर दिला जाणार आहे. या कराराप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., नॉर्वेच्या मानद कॉन्सुल जनरल मोनिका नागेलगार्ड आणि हायके कंपनीचे अध्यक्ष चार्ल्स पेम्ब्रोक बिर्स यांच्यासह विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

फायदा काय होणार?


मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येसाठी रस्ते आणि लोकल ट्रेनव्यतिरिक्त जलवाहतूक हा सक्षम पर्याय ठरत आहे. "मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्प हा शहराची नवी ओळख ठरेल. नॉर्वेच्या सहकार्यामुळे आपल्याला जागतिक दर्जाचे सागरी तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

Comments
Add Comment

Bhandup Sewage Treatment Plant : भांडुपचा मल जल शुध्दीकरण प्रकल्प ऑक्टोबर २०२६मध्ये होणार कार्यान्वित

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप येथील मल जल शुध्दीकरण प्रकल्पाचे काम आता पूर्ण होवून येत्या ऑक्टोबर २०२६ पर्यंत

Kanjurmarg Dumping Ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर साडेतीन हजार झाडांची लागवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर

Dr. Ashwini Joshi : डॉ. अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती, नवा आदेश जारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या (BMC) अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या बदलीच्या

BEST : कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वीच मेस्मा लागू, रजा मंजुरीवरही निर्बंध

मुंबई : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमातील १२ कामगार संघटनांच्या संयुक्त कृती

Vidyavihar Flyover : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; ४५ मिनिटांचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत!

मुंबई: मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या 'विद्याविहार उड्डाणपूल' (ROB) प्रकल्पाचे काम

Mumbai News : मुंबईत फूड डिलिव्हरी करणारी तरुणी पोलीस दलातील नोकरीसाठी करत आहे तयारी

मुंबई : गर्दीने व्यापलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर दिवसरात्र एक तरूणी धावत असते. हातात फूड डिलिव्हरी बॅग आणि