IPL 2026 : जसप्रीत बुमराहवर दिग्गज खेळाडू संतापला आणि म्हणाला..

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये काल (४ मे सोमवार) मुंबई विरुद्ध लखनऊचा सामना झाला. या सामन्यात मुंबईने लखनऊचा सहा विकेट्स राखून पराभव केला. सामन्यात रोहितच्या आगमनाने चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली होती. पण याच सामन्यातील कामगिरीवरून दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी जसप्रीत बुमराहवर टीका केली आहे. तुम्ही वारंवार नो बॉल टाकू शकत नाही, असे गावसकर बुमराहला उद्देशून म्हणाले.



नेमकं घडलं काय ?


हा हंगाम बुमराहसाठी फारसा चांगला ठरला नाही. माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर यांनी लखनऊ विरुद्ध झालेल्या सामन्यात बुमराहच्या कामगिरीवर जोरदार टीका केली. मुंबईच्या गोलंदाजी दरम्यान, १४ व्या षटकात बुमराहच्या एका चेंडुवर हिम्मत सिंग रायन रिकेल्टनच्या हाती झेलबाद झाला होता, पण तो बॉल पंचांनी नो बॉल दिला. यावेळी समालोचन करताना सुनील गावसकर संतापले. गावसकर म्हणाले की, माझा विश्वासच बसत नाही. बुमराह नो बॉल टाकू शकतो. पुढे बोलताना ते म्हणाले, मला पुनहा सांगू नका की बुमराहने नो बॉल टाकला आहे. हे अस्वीकार्ह आहे. तुम्ही प्रोफेशनल क्रिकेटपटू आहात, तुम्ही एक वेळे वाईड टाकू शकता, पण नो बॉल अजिबात नाही.” यानंतर हिम्मत ने ४० धावांची खेळी केली. या सामन्यात बुमराहने ४ षटकात ४५ धावा दिल्या.


Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)