Marathi Conversation Guide : रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मराठी संवाद मार्गदर्शिका

मुंबई : महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी भाषेत संवाद साधणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषा न आल्यास परवाने तात्काळ रद्द करण्याच्या नियमाला स्थगिती दिली आहे. परंतु परिवहन विभागाने ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी अधिक चांगल्या प्रकारे वागण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी एक विशेष निर्देश जारी केला आहे. परिवहन विभागाने ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी बोलण्याचा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यानुसार चालकांनी महिलांना ‘ताई-मावशी’ आणि पुरुष प्रवाशांना ‘भाऊ-काका’ म्हणून संबोधणे अनिवार्य आहे. आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी एक संभाषण मार्गदर्शिका विकसित करण्यात आली आहे. यामध्ये ऑटो-रिक्षा व टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यातील दैनंदिन संभाषणांचे मराठी तसेच हिंदीमध्ये वर्णन केले आहे.


प्रवाशांना सेवा देताना कसे बोलावे आणि कसे वागावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना महिलांना ‘ताई-मावशी’ आणि पुरुषांना 'भाऊ-काका' म्हणून संबोधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा उपक्रम प्रवाशांना, विशेषतः महिलांना, सुरक्षित आणि सन्मानजनक प्रवास सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. परिवहन विभागाने मराठी भाषा विभाग आणि विविध साहित्यिक संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे.



रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी ‘मराठी मंत्र’; संवाद होणार अधिक सुसंस्कृत


मराठी भाषेचा वापर वाढवणे आणि प्रवाशांचा विश्वास संपादन करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. नम्रपणे आणि मराठीत बोलून प्रवासी सेवा सुधारण्यासाठी ही संवाद मार्गदर्शिका विकसित करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र माझी मराठी माझी बोलली भाषा!’ या भावनेने तयार केलेल्या या उपक्रमाचा उद्देश प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद सोपा, नम्र आणि स्पष्ट करणे हा आहे.

Comments
Add Comment

पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर

Central Railway New Rule : 'धूम्रपान ते फेरीवाले…' रेल्वेत गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही; रेल्वे कायद्यात झाले 'हे' मोठे बदल

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्या

Maharashtra Rojgar Melava 2026 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी! राज्यात होणार १ हजार रोजगार मेळावे; मंत्री मंगलप्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व

Nitesh Rane : रत्नागिरीला मिळणार जागतिक ओळख! भगवती बंदरात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलला गती; पर्यटन, रोजगाराला मोठी चालना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर (Bhagwati Port) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल (cruise terminal)

Devendra Fadnavis : कलम ३७० हटवण्याचा निर्णय म्हणजे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'च्या संकल्पनेला बळ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना अभिवादन

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० (Article 370) आणि ३५A रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला सात वर्षे पूर्ण होत असताना