HSC Result : राज्याचा बारावीचा निकाल शनिवार २ मे रोजी जाहीर होणार

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता बारावीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. हा निकाल ॲानलाईन जाहीर होणार असून शनिवारी, दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. मुंबईतून सुमारे तीन लाख ५० हजार १५ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यंदा राज्य शिक्षण मंडळाने १० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान राज्यभरात परीक्षा घेतल्या. या परीक्षेसाठी राज्यभरातून १५ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मुंबईतून तीन लाख ५० हजार १५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या विद्यार्थ्यांना आता २ मे रोजी दुपारी १ वाजता अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.


गुणपडताळणीसाठी ३ मेपासून अर्ज करता येणार : या निकालाबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास विद्यार्थी ३ ते १७ मे या कालावधीत गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी ॲानलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना https://mahasscboard.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने स्पष्ट केले.


या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल : https://results.digilocker.gov.in , https://mahahsscboard.in , https://hscresult.mkcl.org , https://results.targetpublications.org , https://results.navneet.com , https://www.tv9marathi.com

Comments
Add Comment

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारले नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई

लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर