गॅस सिलेंडर मोफत हवा आहे ? मग मोदी सरकारची 'ही' भन्नाट योजना तुम्हांला माहित असायलाच हवी

ग्रामीण भागात अजूनही अनेक महिला पारंपरिक इंधनावर स्वयंपाक करतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. हीच बाब लक्षात घेता केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे महिलांना धुरापासून मुक्ती मिळून सुरक्षित आणि स्वच्छ इंधनाचा वापर करता येतो. आतापर्यंत देशभरात १० कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. (Pradhan Mantri Ujjwala Yojana)


प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेद्वारे दारिद्र्यरेषेखालील महिलांना मोफत गॅस कनेक्शन, सिलेंडर आणि गॅस शेगडी दिली जाते. २०१६ पासून सुरू झालेल्या या योजनेमुळे लाखो महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना स्वयंपाकासाठी सुरक्षित आणि परवडणारे इंधन उपलब्ध करून देणे. यामुळे महिलांचे आरोग्य सुधारते तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनात सुलभता येते.


प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये अर्जदार महिला किमान १८ वर्षांची असावी, संबंधित महिलेकडे यापूर्वी गॅस कनेक्शन नसावे, लाभार्थी बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) कुटुंबातील असावा, महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील असावी,भारत गॅस,इंडियन गॅस किंवा एचपी गॅस यापैकी कोणत्याही कंपनीची निवड करता येते. (Pradhan Mantri Ujjwala Yojana)


या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असते. जसे की,
जात प्रमाणपत्र
बीपीएल रेशनकार्ड
मोबाईल नंबर
पत्त्याचा पुरावा (उत्पन्न दाखल्यासह)
पासपोर्ट आकाराचा फोटो


अर्ज कसा कराल?
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी www.pmuy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे. या संकेतस्थळावर योजनेची सविस्तर माहिती उपलब्ध असून, ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रक्रिया पूर्ण करता येते.

Comments
Add Comment

Jai Konkan : भाजपच्या तेजिंदर सिंग तिवानाने महापालिकेत लावला जय कोकणचा नारा

अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात मालवणी भाषेतून मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पिय भाषणात

AC Local : मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या संख्येत वाढ, जाणून घ्या पनवेल - CSMT मार्गावर किती एसी लोकल धावणार ?

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी-पनवेल हार्बर

Baramati and Rahuri : बारामतीत सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिले एवढ्या मताधिक्क्याने जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज

पुणे/अहिल्यानगर : राज्याच्या राजकीय पटलावर अत्यंत संवेदनशील ठरलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा

AI based Exit Poll : प. बंगालमध्ये मुसंडी मारताना आसाममधील भाजपचा गड राहणार अभेद्य!

तामिळनाडूत द्रमुकचा डंका; केरळमध्ये ‘लाल किल्ल्या’च्या बुरुजाला तडे जाणार नवी दिल्ली : पाच राज्यांच्या

Wall collapse near Hospital : रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये ३ मुलांचा समावेश

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूत बोअरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात

West Bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार, एक्झिट पोलचा अंदाज

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान संपले आहे. पहिल्या टप्प्यात ९२