धक्कादायक ! लग्नाला नकार दिल्याचा राग अनावर, तरुणानं संतापाच्या भरात प्रेयसीसह तिच्या आईला संपवलं

Crime News : विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला नकार दिल्याचा राग अनावर झाल्याने एका २५ वर्षीय तरुणाने त्याची प्रेयसी आणि प्रेयसीच्या आईची क्रूर हत्या केली आहे. विरार पश्चिमेतील न्यू विवा कॉलेज परिसरातील पूनम आकांक्षा या इमारतीत ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर आरोपीने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज दुपारी उघडकीस आली. (Virar Crime News)


लग्नाला नकार दिल्याने संताप अनावर
मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेतील न्यू विवा कॉलेज परिसरातील पूनम आकांक्षा या इमारतीत नॅन्सी मिश्रा (वय 24) आणि तिची आई सरिता मिश्रा (वय 45) राहत होत्या. मागील दोन वर्षांपासून आरोपी शिवम उपाध्याय (वय 25) आणि नॅन्सी यांच्यात प्रेमसंबंध होते. या नात्याला लग्नाचे स्वरूप देण्यासाठी आरोपी काल रात्री आपल्या नातेवाईकांसह नॅन्सीच्या घरी गेला होता. मात्र, या विवाहाला नॅन्सीच्या आईने विरोध दर्शविला आणि नॅन्सीनेही लग्नास नकार दिला.


नॅन्सी आणि तिच्या आईकडून लग्नाला विरोध असल्याचे समजताच शिवमचा संताप अनावर झाला. संतप्त झालेल्या आरोपीने आज दुपारी साडेबाराच्या सुमारास धारदार हत्यार घेऊन नॅन्सीच्या घरात प्रवेश केला आणि नॅन्सी व तिच्या आईवर सपासप वार करत त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. घरातून आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसताच पोलिसांना माहिती देण्यात आली. (Virar Crime News)


घटनेची माहिती मिळताच बोलींज पोलीस ठाणेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली होती. घटनेची माहिती मिळताच बोलींज पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन दोन्ही मृतदेह पुढील तपासासाठी शवविच्छेदनास पाठवले असून या दुहेरी हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित

10 वी पास दाम्पत्याचं कांड ऐकून तुम्हालांही बसेल धक्का, निवृत्त न्यायाधीशाचं घर भाड्यानं घेतलं आणि...

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही वर्षांपूर्वी राज्यात बीडमधील मुंडे दाम्पत्याकडून होत असलेल्या गर्भपात घटनेचा

Aakhri Sawaal : संजय दत्त यांच्या ‘आखरी सवाल’ मधील ‘नमस्ते सदा वत्सले’ या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ समोर, मातृभूमीप्रती समर्पणाचा दमदार आविष्कार!

मुंबई :  संजय दत्त यांचा ‘आखरी सवाल’ हा सध्या सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक ठरत आहे आणि प्रेक्षक त्याच्या

Jalgaon accident : भीषण अपघातात नववधूसह तिघांचा दुर्दैवी अंत; वऱ्हाड घेऊन निघालेल्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Jalgaon accident : जळगाव जिल्ह्यातुन एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्याच्या धरणगावमध्ये (Dharangaon Accident News) एक अतिशय

महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात, घेतला मोठा निर्णय

महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी महायुती सरकार आता मैदानात उतरले आहे. लवकरच महायुती सरकार महिला

West Bengal : विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी आज मतदान; ममता बॅनर्जी -सुभेंदू अधिकारी आमने सामने

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे.. या टप्प्यात राज्यातील १४२